शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ऊसाच्या गाळपासाठी प्रयत्न करणार - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:53 IST

भाजप सरकारवर कडाडून टीका

चोपडा : चोपडा सहकारी साखर कारखाना मी चालवणार नाही मात्र गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकºयांचे दोन कोटी ४४ लाख रुपये साखर आयुक्तांशी चर्चा करून शेतकºयांना देण्यासंदर्भात मार्ग काढला जाईल असे सांगत चोसाका यंदा बंद असल्याने उभा ऊस निश्चितपणे तोडून गाळपासाठी पाठविला जाईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील शेतकºयांना दिली.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित निर्धार परिवर्तन यात्रा शनिवारी दुपारी १२ वाजता शहरात दाखल झाली. बाजार समितीमध्ये सभा झाली. त्या वेळी अजित पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी शिक्षण मंत्री फौजिया खान, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप सोनवणे, पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रवींद्र पाटील, पालिकेतील गटनेते जीवन चौधरी, राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष गफ्फार मलिक, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, राष्ट्रवादी आदिवासी जिल्हा सरचिटणीस कांचन राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन अ‍ॅड. घन:श्याम पाटील, माजी सभापती डी. पी. साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. नीलम पाटील, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा विजया पाटील, चोसाकाच्या माजी चेअरमन नीता पाटील, प्रभादेवी गुजराथी, कृष्णा पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, माधुरी पाटील आदी उपस्थित होते.तालुक्यातील चहार्डी येथील साखर कारखाना अजित पवार चालवतील अशी सर्वत्र चर्चा असताना जाहीर भाषणात अजित पवार यांनी मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केला. असे असले तरी उभा ऊस निश्चितपणे तोडून तो पुतण्या रोहित पवार हा चालवत असलेला नंदुरबार येथील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील कारखान्यात गाळपासाठी पाठविला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.शेतीमालाला भाव मिळण्यासाठी परिवर्तन आवश्यकपूर्वी दिल्ली येथे शरद पवार आणि महाराष्ट्रात आम्ही असल्याने अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढला जायचा. मात्र सध्या विरोधी पक्षात असल्याने आपल्याला अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांवर मार्ग काढता येणे अवघड असल्याचेही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवून उर्वरीत पाणी शेतकºयांसाठी देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना सांगणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशात आणि राज्यात थापा मारणारे हे भाजपा सरकारवर जनता नाराज आहे. शेतीमालाच्या भावाबाबत न्याय देण्यासाठी आपल्याला निश्चितपणे परिवर्तन करावे लागेल असेही अजित पवार यांनी उपस्थितांसमोर सांगितले.गिरीश महाजन यांनी महाराष्ट्रातील पाणी गुजरातकडे वळविले- छगन भुजबळमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जळगाव जिल्ह्यासह राज्याचे पाणी जळगाव जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळे गुजरातकडे वळविले असा घाणाघाती आरोप करून जिल्हावासीयांनी यासाठी विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगून जळगाव जिल्हा पाण्यासाठी तडफडत असताना दुर्लक्ष करणाºया अशा मंत्र्यांना बाजूला सारा आणि परिवर्तन घडवा असे आवाहन केले.केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की, ‘अच्छे दिन’ नाही तर ‘बचे कितने दिन’ असे आता लोक म्हणायला लागले आहेत. शेतीमालाला भाव देत नसताना अडावद येथे कांदा मार्केटमध्ये असंख्य ट्रक आणि ट्रॅक्टर उभे असून त्यांची भेट घेतली असता एका क्विंटल कांद्याला ८०० रुपये खर्च येत असताना केवळ शंभर, दोनशे आणि तीनशे रुपये प्रती क्विंटल कांदा द्यावा लागत आहे. शेतकºयांचा खर्चही वसूल होत नाही असे असताना शेतकºयांना भरपूर देणार असे म्हणणारे पंतप्रधान मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केली बंदी आणि डान्स बारची उठवली बंदी असे हे सरकार आहे. यासोबत या सरकारने सहकार क्षेत्रही संपविलेले असून सर्वच ठिकाणी भाजपा सरकार नापास झालेले असल्याची टीका भुजबळ यांनी केली.महाराष्ट्र सदनाचे काम शंभर कोटी रुपयांचे असताना साडेआठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगून सरकार दिशाभूल करत आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आमदार बेताल व खोटी वक्तव्य करण्याचे व्हिडिओ दाखवित असल्याचे सांगून केंद्रात आणि राज्यात खोटारडे सरकार असल्याचे सांगितले. अरुणभाई गुजराथी यांनीही मनोगत व्यक्त केले.सभेत ‘लोकमत’चा अंक दाखविलाछगन भुजबळ हे भाषण करीत असताना त्यांनी हातात ‘लोकमत’चा अंक घेऊन पहिल्या पानावरील नऊ महिन्यांत ५०० लहान मुले दगावल्याची बातमी असल्याचा मुद्दा उपस्थितांसमोर मांडला. उच्च न्यायालयाने हा अहवाल जाहीर केला असून याकडे भाजपा सरकार दुर्लक्ष करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.शेतकरी कृती समितीतर्फे अजित पवार यांना निवेदनजळगाव येथून अजित पवार चोपडा येथे येत असताना धरणगाव नाक्याजवळ शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस. बी. पाटील आणि शेकडो शेतकºयांनी गाड्यांंचा ताफा अडवून अजित पवार यांना चोपडा साखर कारखाना संदर्भात लेखी निवेदन दिले. तालुक्यातील शेतकºयांच्या शेतांमध्ये उभा असलेला ऊस तोडण्यासंदर्भात तसेच गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत दोन कोटी ४४ लाख रुपये मिळवून देण्यासाठी विनंती केली.सूत्रसंचालन चंद्रहास गुजराथी आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय कानडे यांनी केले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव