शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मनपाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे येणार? नव्याने ‘मिलीभगत’चे राजकारण सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 10:56 IST

महापालिकेची २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजप व शिवसेनेच्या सत्तेच्या काळात कोणत्याही पक्षाला शहराचा विकास करता आलेला नाही.

जळगाव : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतदेखील शिवसेनेला बहुमत गमाविण्याची वेळ आली आहे. महापौर व उपमहापौरपद जरी शिवसेनेकडे असले तरी बहुमताअभावी महिनाभरानंतर होऊ शकणाऱ्या मनपा स्थायी समिती मात्र भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच भाजपचे बंडखोर शिंदे गटात गेले असले तरी शिंदे गटात गेलेल्या बंडखोर नगरसेवकांचे भाजप किंवा शिवसेनेसोबतदेखील फारसे आलबेल नाही, तर शिवसेनेकडे बहुमत नाही व भाजपकडे महत्त्वाची पदे नाहीत, अशावेळी मनपातील सर्वच गट-तटांकडून आता वर्षभरासाठी एकत्रित संसार म्हणजेच मिलीभगतचे राजकारण करण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेची २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजप व शिवसेनेच्या सत्तेच्या काळात कोणत्याही पक्षाला शहराचा विकास करता आलेला नाही. त्यातच दोन्ही सत्ताधाऱ्यांच्या काळात गटबाजीच्या ग्रहणामुळे नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागात कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे राज्यातील सत्तांतराप्रमाणेच नगरसेवकांनी इकडे-तिकडे उड्या मारल्या खऱ्या. मात्र, तरीही ठरावीक नगरसेवक वगळता अनेकांना प्रभागातील विकासकामेदेखील करता आलेले नाहीत. त्यातच आता मनपा निवडणुकीला केवळ वर्षभराचा वेळ शिल्लक असल्याने व कामे न झाल्यामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले असून, आता निदान वर्षभरात तरी ठरावीक कामे मार्गी लावण्याची जाग नगरसेवकांना आली आहे. त्यामुळे मनपात आता नव्याने ‘मिलीभगत’चे राजकारण सुरू होणार आहे.

मनपातील एकतर्फी निर्णय घेण्याची क्षमता कोणत्याच पक्षाकडे नाही

१. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते ही पदे शिवसेनेकडे निर्णय घेण्याची क्षमता नसली तरी प्रस्ताव आणण्याची निर्णय क्षमता यांच्याकडे आहे.

२. भाजपकडे मनपात कोणतेही पद नसले तरी नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने महापौर, प्रशासनाकडून प्रस्ताव आले तर मंजुरी-नामंजुरीचे अधिकार घेण्याची क्षमता भाजपकडे आहे.

३. भाजप बंडखोर नगरसेवकांच्या गटातच तीन गट आहेत. एक गट शिंदे गटात, दुसरा भाजपमध्ये परत गेला, तर तिसरा शिवसेनेकडे आहे. महत्त्वाची पदे नसली तरी मनपातील निर्णय घेण्याच्या वेळेस हा गट कोणत्या बाजूने झुकतो यावरही गणित अवलंबून राहणार.

मग निर्णय घेण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्यायच नाही

१. मनपात एकाच पक्षात निर्णय घेण्याची क्षमता नसल्यानेही आता शेवटचे मनपाचे वर्ष एकत्रित येऊन काढण्याशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच नगरसेवकांना माहिती आहे.

२. शिवसेनेलाही हे गणित माहिती असल्यानेच ६२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावात शिवसेनेच्या नगरसेवकांपेक्षा भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना देण्यात आले प्राधान्य.

३. भाजप बंडखोरांची स्थिती अधांतरीतच आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत कोणत्या गटात जातील किंवा भाजपमध्येच परततील, अशी स्थिती असल्याने भाजप व शिवसेनाही बंडखोरांना सोबत घेऊन आगामी मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू शकते. त्यामुळे आगामी वर्षभरात मनपाच्या राजकारणात एकोपा दिसू शकतो.

पक्ष नाही तर प्रशासन राहणार रडारवर

महापालिकेच्या गेल्या चार वर्षांतील महासभांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, शिवसेना विरुद्ध भाजप, विरुद्ध बंडखोर, असेच वाद रंगलेले दिसून आले. मात्र, आगामी वर्षभराच्या मनपातील शिल्लक कार्यकाळात सर्वच पक्षातील नगरसेवकांच्या रडारवर सत्ताधारी किंवा विरोधक राहणार नसून, आता थेट मनपा प्रशासनच रडारवर राहण्याची शक्यता आहे. त्याचा प्रत्यय गेल्या दोन महासभांमध्येदेखील दिसून आला. झालेल्या कामांचे श्रेय नेत्यांना, तर न झालेल्या कामांचे खापर प्रशासनावर फोडण्याची रणनीती आगामी महासभांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांची दिसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव