शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जोडीदाराची निवड करताना वेळ देणे महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:24 IST

तरुणाईची मोठी गर्दी : युवा संकल्प अभियान परिषदेतील सूर, तरूणांनी सद्सदविवेकबुध्दीने जगावे

जळगाव : तरुणाईला जीवनात नाक, कान, डोळे जागृत ठेवून चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे. त्यासाठी सद्विवेकबुद्धीने तरुणांनी जगावे. तसेच जोडीदाराची निवड करताना पुरेसा वेळ देणेदेखील महत्वाचे आहे, असा सूर जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेतून निघाला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी अ‍ॅड. एस .ए. बाहेती महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, परेश शहा (शिंदखेडा), विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, प्राचार्य डॉ. अनिल लोहार व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. या अभियानाचा समारोप १४ फेब्रुवारी ला कोल्हापुर येथे होणार आहे.अविनाश पाटील यांनी विवाहातील अनिष्ट प्रथा आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी हे अभियान समाज विकासात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे सांगितले.समारोपाच्या अध्यक्षस्थानी असलेले अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांनी जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वितेसाठी गौरव अळणे, प्रधान सचिव अशोक तायडे, अशफाक पिंजारी, विजय लुल्हे, मंजूर पिंजारी, संदीप कुमावत, सायली चौधरी, आर. वाय. चौधरी, दिलीप पाटील, शिरीष चौधरी, हमीद बारेला, कडू पाटील, प्रवीण नागपुरे, गुरुप्रसाद पाटील, पिरन अनुष्ठान, प्रकाश तामसवरे, डॉ. अनिल लोहार, डॉ. खेमराज पाटील यांनी परिश्रम घेतले.जोडीदाराची निवड करताना छंद, आवडीनिवडी विचारात घ्याभावी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड का व कशी करावी याबाबतची प्रथम सत्रात चर्चासत्र घेण्यात आले.यात महेंद्र नाईक, निशा फडतरे व सचिन थिटे यांनी जोडीदाराची निवड करताना छंद, स्वभाव, आवडीनिवडी, विचारधारा यासह विविध विधायक बाबींना महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात रूढी परंपरांना फाटा देऊन संघर्षमय पद्धतीने विवाह करणाºया तीन जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जळगाव येथील विश्वजीत चौधरी-मिनाक्षी कांबळे, जामनेर तालुक्यातील नेरी येथील आशिष दामोदर-कांचन सोनवणे व औरंगाबाद येथील दीक्षा काळे -आनंद कन्नुर यांचा समावेश होता. या जोडप्यांची कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात यांनी मुलाखत घेतली.-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.-धुळे, नंदूरबार, जळगावच्या विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव