शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जोडीदाराची निवड करताना वेळ देणे महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:24 IST

तरुणाईची मोठी गर्दी : युवा संकल्प अभियान परिषदेतील सूर, तरूणांनी सद्सदविवेकबुध्दीने जगावे

जळगाव : तरुणाईला जीवनात नाक, कान, डोळे जागृत ठेवून चिकित्सकपणे निर्णय घेता आले पाहिजे. त्यासाठी सद्विवेकबुद्धीने तरुणांनी जगावे. तसेच जोडीदाराची निवड करताना पुरेसा वेळ देणेदेखील महत्वाचे आहे, असा सूर जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेतून निघाला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी अ‍ॅड. एस .ए. बाहेती महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, परेश शहा (शिंदखेडा), विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक, प्राचार्य डॉ. अनिल लोहार व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस. कट्यारे उपस्थित होते. या अभियानाचा समारोप १४ फेब्रुवारी ला कोल्हापुर येथे होणार आहे.अविनाश पाटील यांनी विवाहातील अनिष्ट प्रथा आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी हे अभियान समाज विकासात महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे सांगितले.समारोपाच्या अध्यक्षस्थानी असलेले अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी यांनी जोडीदाराची विवेकी निवड आणि मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. परिषदेला जळगाव, धुळे, नंदुरबार येथील विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वितेसाठी गौरव अळणे, प्रधान सचिव अशोक तायडे, अशफाक पिंजारी, विजय लुल्हे, मंजूर पिंजारी, संदीप कुमावत, सायली चौधरी, आर. वाय. चौधरी, दिलीप पाटील, शिरीष चौधरी, हमीद बारेला, कडू पाटील, प्रवीण नागपुरे, गुरुप्रसाद पाटील, पिरन अनुष्ठान, प्रकाश तामसवरे, डॉ. अनिल लोहार, डॉ. खेमराज पाटील यांनी परिश्रम घेतले.जोडीदाराची निवड करताना छंद, आवडीनिवडी विचारात घ्याभावी जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड का व कशी करावी याबाबतची प्रथम सत्रात चर्चासत्र घेण्यात आले.यात महेंद्र नाईक, निशा फडतरे व सचिन थिटे यांनी जोडीदाराची निवड करताना छंद, स्वभाव, आवडीनिवडी, विचारधारा यासह विविध विधायक बाबींना महत्व देणे गरजेचे असल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात रूढी परंपरांना फाटा देऊन संघर्षमय पद्धतीने विवाह करणाºया तीन जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जळगाव येथील विश्वजीत चौधरी-मिनाक्षी कांबळे, जामनेर तालुक्यातील नेरी येथील आशिष दामोदर-कांचन सोनवणे व औरंगाबाद येथील दीक्षा काळे -आनंद कन्नुर यांचा समावेश होता. या जोडप्यांची कोल्हापूर येथील स्वाती कृष्णात यांनी मुलाखत घेतली.-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.-धुळे, नंदूरबार, जळगावच्या विविध महाविद्यालयातील ३०० विद्यार्थी सहभागी. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव