शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

"उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावे लागतेय याच्यापेक्षा दुर्दैव काय?" गुलाबराव पाटील यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:20 IST

Gulabrao Patil: उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली

जळगाव - आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे आम्हाला आमदारकीचा राजीनामा देण्याची गरजच नाही. आम्ही शिवसेनेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असून, त्यासाठी दिवसरात्र झटून पुढेही काम करत राहू. मात्र, पक्षप्रमुखांनी जे आधी करायला हवे होते ते आता करीत आहेत. उद्धव ठाकरेंना विनामास्क शिवसेनेच्या शाखांवर जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी दुर्दैव म्हणावेच लागेल, आदित्य ठाकरे आज निष्ठायात्रा काढत आहेत, हेच काम जर आधी केले असते तर पक्षावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे युवा सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील हे बोलत होते. यावेळी राजेंद्र चव्हाण, प्रताप पाटील, शिवराज पाटील यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा सेनेच्या तालुका व जिल्हा प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून, नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांना जर बाहेर फिरता येत नव्हते तर आदित्य ठाकरे यांनी फिरायला पाहिजे होते. आम्ही तेव्हा हेच सांगायचो. मात्र, तेव्हा ऐकले नाही. आता मात्र शाखेवर जाऊन पक्षाच्या बैठका घेतल्या जात आहेत. ते काम आधीच करणे गरजेचे होते, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.  शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जिल्ह्यातील सर्व बंडखोर आमदारांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता, सावंत यांनी आधी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी. चार-चार वेळा आमदार राहिलो आहे. जळगाव जिल्ह्यातील ४८ अंशाच्या तापमानात फिरलो आहे, तेव्हा या निवडणुका जिंकता आल्या, हे मुंबईला बसून असलेल्यांना काय कळेल ? असा टोला गुलाबराव पाटील यांनी सावंत यांना लगावला आहे.

दोन दिवस जिल्ह्यातच, पुढे पहाचगेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नसल्याने अनेकांसोबत चर्चा करता आलेली नाही; मात्र आता दोन दिवस जिल्ह्यातच थांबणार असल्याने अनेकांसोबत चर्चा करायच्या आहेत. तसेच येत्या काळात त्याबाबतचे चित्र दिसेलच असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

रस्त्यांची कामे न करणाऱ्या मक्तेदारावर  फौजदारी गुन्हे दाखल करा-गुलाबराव पाटीलमहापालिकेतील काही नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. येत्या काळात अजून काही नगरसेवक पक्षात येतील. महापालिकेतील सत्तेपेक्षा आम्हाला जळगाव शहराचा विकास महत्त्वाचा असून, पालकमंत्री असताना शहराच्या विकासासाठी १२० कोटी रुपयांचा निधी दिला आहे; मात्र अजूनही हा निधी खर्च करता आला नसल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली. तसेच शहरातील रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करण्यात येणारच आहे. मात्र, संबंधित मक्तेदाराकडून रस्ते दुरुस्तीचे काम करून घेण्यात यावे; अन्यथा या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावे किंवा मग थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना