शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:58 AM

खरीप दुष्काळ अनुदानाचे ९९.६१ टक्के वाटप पूर्ण

जळगाव : जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके पूर्णपणे दुष्काळी तसेच उर्वरीत दोन तालुक्यांनाही पैसेवारी कमी आल्याने दुष्काळाचे निकष लागू झालेले असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील खरीपाचे नुकसान झालेल्या ५ लाख ८२ हजार १४६ शेतकऱ्यांना खरीप दुष्काळी अनुदानाचे ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपयांचे म्हणजेच ९९.६१ टक्के रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून १९३ गावांना सध्या १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार मीना हे बुधवार, १५ रोजी जिल्हा दौºयावर येत असून ते सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दालनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्केच पाऊस झाल्याने यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ पडला असून आहे. त्यापैकी जळगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, पारोळा, यावल, रावेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर एरंडोल व धरणगाव हे तालुके मात्र केंद्र शासनाच्या निकषात न बसल्याने वगळण्यात आले. मात्र या दोन तालुक्यांमध्ये देखील पीक पैसेवारी ५० टक्क्यांच्या आतच आली आहे. मात्र खरीप दुष्काळ अनुदान मात्र १३ तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांनाच वाटप करण्यात आले आहे.५ लाख ८२ हजार शेतकºयांना दुष्काळ अनुदान वाटपजिल्ह्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १३ तालुक्यातील १३४६ गावांमधील ५ लाख ८२ हजार १४६ शेतकºयांना खरीप दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी शासनाकडून ४०४ कोटी ६१ लाख ४१ हजार २८० रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून ३८६ कोटी ३८ लाख ५८ हजार ७५३ रूपये इतका निधी दुष्काळ अनुदान म्हणून वाटप करण्यात आला आहे. तर प्रशासकीय खर्चाचे ५९ लाख ९४ हजार ८०० रूपये वगळण्यात आले आहेत. तसेच १७ कोटी ६२ लाख ८७हजारांचा निधी आवश्यकता नसल्याने शासनाला परत करण्यात आला आहे. १३ पैकी भुसावळ व बोदवड तालुका वगळता उर्वरीत ११ तालुक्यांमध्ये १०० टक्के अनुदानाचे वाटप झाले असून भुसावळमध्ये ९५.१३ टक्के तर बोदवड तालुक्यात ९४.०१ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे.बोंडअळी अनुदान वितरणाची आकडेवारीच नाहीमागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशी पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील शेतकºयांना वाटपासाठी ४३९ कोटी ४० लाख ८० हजारांचे वितरण जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे. मात्र तालुकास्तरावरून किती शेतकºयांना त्याचे वितरण झाले? याची आकडेवारीच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. तहसीलदारांकडून ही माहिती मागवूनही तातडीने सादर करण्यात आलेली नाही. निवडणुकीच्या कामाचे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे.२७१ गावांसाठी २७८ विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. जोरदार पाऊस न झाल्याने धरण, बंधाºयांमध्ये ठणठणाट आहे. मोजक्या धरणांमध्येच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे १९३ गावांना १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. तर २७१ गावांसाठी २७८ विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ५४ गावांसाठी ५१ तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. तर ६१ गवांसाठी १११ नवीन विंधन विहिरी तर ४२ गावांना ५८ नवीन कपूनलिका घेण्यात आल्या आहेत. ४८ गावांमध्ये ४८ विहिरींचे खोलीकरण करण्यात आले आहे. तर २ गावांना २ नळपाणी योजनांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव