शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

पाणी असून सिंचनाची समस्या : बंधारे ठरताहेत निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 9:17 PM

  अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी ...

 

अमळनेर : तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नसून फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.दरवर्षी अत्यल्प होणाºया पावसामुळे पावसाच्या पाण्याचे सिंचन व्हावे यासाठी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’सारख्या मोहिमांमध्ये शासन दरवर्षी निधीची तरतूद करते. पण अनेक ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामांमुळे जलसिंचन होत नसल्याचे वास्तव विविध घटनांतून समोर येत आहे.बंधारा पाट्यांविनामारवड शिवारात धानोरा गावाजवळ माळण नदीवर लघुसिंचन विभागातर्फे बंधारा बांधून दोन ते तीन वर्षे झाली. मात्र अद्याप त्या ठिकाणी पाट्या टाकण्यात आलेल्या नाहीत. नाल्यातून पाणी वाहून जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. ज्या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले आहेत तो साध्य होताना दिसत नाही, असा सूर शेतकरीवर्गातून ऐकायला मिळत आहे.पहिल्याच पावसात गळतीकळमसरे परिसरात यावर्षी भूजल सर्वेक्षण अंतर्गत लघुसिंचन विभागामार्फत सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी अडविले गेले नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी संताप व्यक्त केला असून, तत्काळ दुरुस्तीसह दोषींवर कारवाईची मागणीही केली आहे. शासनाने मंजूर केलेल्या सिमेंट बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम करण्यात आल्याने पाणी अडविले गेलेच नाही, उलट त्यास गळती लागली आहे. बारदान व मातीचा लेपपावसाळा सुरू होताच पडलेले पाणी बंधाºयाखालून वाहून गेल्याने शेतकºयांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तक्रार केली. तेव्हा ठेकेदाराकडून गळती होत असलेल्या बंधाºयाला माती टाकून व बारदान लावून दगडांचा भराव टाकला. पण त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे आळखून शेतकºयांनी त्यास विरोध केला. तसेच गळती होत असलेल्या भागाजवळ सिमेंटमिश्रित खडी, रेती टाकण्याची मागणी केली होती. परंतु संबंधित ठेकेदार व अधिकारी यांनी डोळेझाक केली. त्यामुळे निकृष्ट काम होऊन पाणीच अडविले गेले नाही. सरकारी निधीचा अपव्यय केला म्हणून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कळमसरे येथील शेतकºयांनी केली आहे.