शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:25 IST

ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही.

ठळक मुद्देआधी १३ दिवस आता अठरा दिवस होऊनही पाणी मिळेना  गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही.

धरणगाव : ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला  जात आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे, विशषे म्हणजे धरणगाव शहरात सर्व राजकीय पक्षांचे जिल्हास्तरिय पदाधिकारी वास्तव्यास आहेत. तरीही अशी विदारक परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणगाव शहरात कित्येक वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरु आहे. चांगला पाऊस होऊन देखील तीच परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे.  नगरसेवक ललित येवले  हे  स्वखर्चाने  आपल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीटंचाईची स्थिती तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत असते.  उन्हाळ्यात एका टँकरला कमीतकमी ८०० रुपये मोजावे लागत असतात.  तेही खाजगी टँकर दोन किंवा तीन दिवस आधी बुक करावे लागते.  तेंव्हाच पाण्याचे टॅंकर उपलब्ध करुन दिले जाते. शहरात  गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण  सुरु आहे  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक  संताप व्यक्त करीत आहेत. सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून भरावे लागत आहे. या ठिकाणी विरोधक मात्र मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 रोटवद जवळ जलवाहीनी फुटलेली आहे.  त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आपण स्वतः त्या ठिकाणी तीन दिवसापासून थांबून आहोत. त्या जलवाहिनीला खाली करण्यास तीन दिवस लागतात.  येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल. - नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

 महिला  दिवसभर  महिला घरी राहतो व पाण्याची भटकंती करत असतो. सकाळी उठल्यापासून तेरात्रीच्या भांडी  धुण्यापर्यँत  आम्ही पाणी शोधत असतो.  गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या कायम आहे. -कल्पना मुसळे, रहिवाशी, धरणगाव  अठरा ते वीस दिवसानंतर आम्हाला पाणी हे मिळत असते मात्र आमच्याकडे पाहुणे आले असून सुद्धा तेही आमच्या सोबत पाणी भरण्याचा मला मदत करत असतात ही आजची धरणगाव ची परिस्थिती आहे.  -राखी पांडे, रहिवाशी, धरणगाव 

 पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पाण्याच्या प्रश्नावरून जनतेने त्यांना दोन ते तीन वेळेस प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिले. पालिकेने प्रत्येक वार्डात टँकरने पाणी पुरवले पाहिजे व एवढ्या वर्षापासून सत्ता असूनदेखील पाण प्रश्न  सुटलेला नाही. - ललित येवले, नगरसेवक, धरणगाव 

टॅग्स :droughtदुष्काळDharangaonधरणगाव