शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:25 IST

ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही.

ठळक मुद्देआधी १३ दिवस आता अठरा दिवस होऊनही पाणी मिळेना  गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही.

धरणगाव : ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला  जात आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे, विशषे म्हणजे धरणगाव शहरात सर्व राजकीय पक्षांचे जिल्हास्तरिय पदाधिकारी वास्तव्यास आहेत. तरीही अशी विदारक परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणगाव शहरात कित्येक वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरु आहे. चांगला पाऊस होऊन देखील तीच परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे.  नगरसेवक ललित येवले  हे  स्वखर्चाने  आपल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीटंचाईची स्थिती तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत असते.  उन्हाळ्यात एका टँकरला कमीतकमी ८०० रुपये मोजावे लागत असतात.  तेही खाजगी टँकर दोन किंवा तीन दिवस आधी बुक करावे लागते.  तेंव्हाच पाण्याचे टॅंकर उपलब्ध करुन दिले जाते. शहरात  गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण  सुरु आहे  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक  संताप व्यक्त करीत आहेत. सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून भरावे लागत आहे. या ठिकाणी विरोधक मात्र मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 रोटवद जवळ जलवाहीनी फुटलेली आहे.  त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आपण स्वतः त्या ठिकाणी तीन दिवसापासून थांबून आहोत. त्या जलवाहिनीला खाली करण्यास तीन दिवस लागतात.  येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल. - नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

 महिला  दिवसभर  महिला घरी राहतो व पाण्याची भटकंती करत असतो. सकाळी उठल्यापासून तेरात्रीच्या भांडी  धुण्यापर्यँत  आम्ही पाणी शोधत असतो.  गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या कायम आहे. -कल्पना मुसळे, रहिवाशी, धरणगाव  अठरा ते वीस दिवसानंतर आम्हाला पाणी हे मिळत असते मात्र आमच्याकडे पाहुणे आले असून सुद्धा तेही आमच्या सोबत पाणी भरण्याचा मला मदत करत असतात ही आजची धरणगाव ची परिस्थिती आहे.  -राखी पांडे, रहिवाशी, धरणगाव 

 पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पाण्याच्या प्रश्नावरून जनतेने त्यांना दोन ते तीन वेळेस प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिले. पालिकेने प्रत्येक वार्डात टँकरने पाणी पुरवले पाहिजे व एवढ्या वर्षापासून सत्ता असूनदेखील पाण प्रश्न  सुटलेला नाही. - ललित येवले, नगरसेवक, धरणगाव 

टॅग्स :droughtदुष्काळDharangaonधरणगाव