शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

धरणगावला ऐन हिवाळयात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:25 IST

ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही.

ठळक मुद्देआधी १३ दिवस आता अठरा दिवस होऊनही पाणी मिळेना  गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही.

धरणगाव : ऐन हिवाळ्यातही धरणगावला १८ दिवस होऊनही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला  जात आहे. त्यामुळे एका नगरसेवकाने टॅंकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे, विशषे म्हणजे धरणगाव शहरात सर्व राजकीय पक्षांचे जिल्हास्तरिय पदाधिकारी वास्तव्यास आहेत. तरीही अशी विदारक परिस्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणगाव शहरात कित्येक वर्षापासून पाण्याचे राजकारण सुरु आहे. चांगला पाऊस होऊन देखील तीच परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे.  नगरसेवक ललित येवले  हे  स्वखर्चाने  आपल्या प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीटंचाईची स्थिती तर उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येत असते.  उन्हाळ्यात एका टँकरला कमीतकमी ८०० रुपये मोजावे लागत असतात.  तेही खाजगी टँकर दोन किंवा तीन दिवस आधी बुक करावे लागते.  तेंव्हाच पाण्याचे टॅंकर उपलब्ध करुन दिले जाते. शहरात  गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पाण्यावरच राजकारण  सुरु आहे  राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदार संघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती असल्याने नागरिक  संताप व्यक्त करीत आहेत. सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून भरावे लागत आहे. या ठिकाणी विरोधक मात्र मौन पाळून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 रोटवद जवळ जलवाहीनी फुटलेली आहे.  त्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. आपण स्वतः त्या ठिकाणी तीन दिवसापासून थांबून आहोत. त्या जलवाहिनीला खाली करण्यास तीन दिवस लागतात.  येत्या तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल. - नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव

 महिला  दिवसभर  महिला घरी राहतो व पाण्याची भटकंती करत असतो. सकाळी उठल्यापासून तेरात्रीच्या भांडी  धुण्यापर्यँत  आम्ही पाणी शोधत असतो.  गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या कायम आहे. -कल्पना मुसळे, रहिवाशी, धरणगाव  अठरा ते वीस दिवसानंतर आम्हाला पाणी हे मिळत असते मात्र आमच्याकडे पाहुणे आले असून सुद्धा तेही आमच्या सोबत पाणी भरण्याचा मला मदत करत असतात ही आजची धरणगाव ची परिस्थिती आहे.  -राखी पांडे, रहिवाशी, धरणगाव 

 पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तरीही  पाणी प्रश्न अजूनही मिटलेला नाही. पाण्याच्या प्रश्नावरून जनतेने त्यांना दोन ते तीन वेळेस प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिले. पालिकेने प्रत्येक वार्डात टँकरने पाणी पुरवले पाहिजे व एवढ्या वर्षापासून सत्ता असूनदेखील पाण प्रश्न  सुटलेला नाही. - ललित येवले, नगरसेवक, धरणगाव 

टॅग्स :droughtदुष्काळDharangaonधरणगाव