शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

लोकसहभागातून होणार गावागावात जलसंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:47 AM

पंतप्रधानांचे सरपंचांना पत्र

जळगाव : दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे व्हावी, यासाठी जनजागृती व कामे वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पत्र दिले असून ते जिल्ह्यातील सरपंचांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. पाटील यांनी दिली. या पत्राचे ग्रामसभेत वाचन करण्यात येणार असून श्रमदानातून जलसंवर्धनाची कामे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जलपातळी घटत जावून दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने श्रमदानातून जलसंधारणाची कामे वाढावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातही पंतप्रधानांच्या संदेशाचे पत्र आले असून ते जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरपंचांना पोहचविण्यात आले आहे. हे पत्र ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर वाचन करावे, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर बैठक घेण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत.जमिनीत अधिकाधिक पाणी साठविणे, जलसंधारणाची कामे करणे, वृक्षारोपणावर अधिक भर देणे, या सर्व बाबीत लोकसहभाग वाढल्यानंतरच दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे़ यासाठी गावागावात, शाळांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, असे वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे़ त्यानुसार पंतप्रधानांनी सर्वांना उद्देशून लिहिले पत्र ग्रामसभेत वाचण्याचा सूचना आहेत़ या पत्राच्या कलर प्रिंट सर्व गटविकास अधिकाºयांना वाटप करण्यात आल्या़ त्यानंतर स्थानिक पातळीवर सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकी घेऊन त्यांना सूचना द्याव्यात व २२ जूनपर्यंत ग्रामसभा घेऊन या पत्राचे वाचन करावे व कामांवर भर द्यावा, अशा सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहे़ ३० जूनपर्यंत या ग्रामसभांचे छायाचित्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचे आदेशही आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव