शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सात्रीचे ग्रामस्थ अजूनही सोसताहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:59 IST

पाण्याचा जोर वाढलेलाच : शेकडो वर्षांसून करतात हा जीवघेणा प्रवास

अमळनेर : ऐतिहासिक प्रगणे डांगरीच्या नदीपलीकडील सात्री गाव दरवर्षी पावसाळ्यात उपजीविकेसाठी शेकडो वर्षांपासून जीवघेणा प्रवास करीत आहे. पुनर्वसित गाव म्हणून शासनाने एकीकडे विकास थांबवला आहे तर दुसरीकडे पुनर्वसन प्रक्रिया देखील १० वर्षांपासून लांबली आहे. शासनाने प्रतिबंधक धरण क्षेत्र जाहीर करून नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली, तर जीवन जगण्यासाठी मात्र पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र ‘लोकमत’ने घटनास्थळी भेट दिल्यानंतर उघडकीस आले.२५ रोजी सकाळी ‘लोकमत’ने सात्री येथे भेट देण्याचा प्रयत्न केला असता बोरी नदीच्या पुरामुळे या गावाला पोहचताच आले नाही. डांगरी या गावात थांबूनच परिस्थिती बघता आली. येथे येण्यासाठी दुसरा पयार्यी रस्ता कलाली निंभोरा गावाकडून आहे. मात्र तिथेही तापी व चिखली, बोरी नदीचे खोरे असल्याने नाल्यातून पावसाळ्यात चालणे अशक्य आहे.गावातील काही दूध उत्पादक अमळनेर व इतर खेड्यांवर दूध आणण्यासाठी आणि राजेंद्र ठाकरे नावाचा आजारी ग्रामस्थला दवाखाण्यात नेण्यासाठी एका खाटेवर मोठा ट्यूूब आणि प्लॅस्टिक कॅन बांधून ती पाण्यातून आणत असताना गावातील चार जण नजरेस पडले. तर अजय भिल नावाचा शेतमजूर हा डांगरी शिवारातील शेती मशागत करण्यासाठी वखर, दुशेर आणि बैलांचे साहित्य नदी पात्रातून पोहत आणताना दिसला. एक एक साहित्य आणि बैलांना नदी पार करून आणण्यासाठी अजयने चार फेऱ्या केल्या. अनेकदा ग्रामस्थांना डांगरी गावातच कपडे कोणाकडे तरी ठेवून पोहत घरी जावे लागते. मनोहर बोरसे या दूध विक्रेत्याने सांगितले की, पावसाळ्यात डांगरी माध्यमिक शाळेत जाणा-या मुलांना आता किती दिवस शाळाबाह्य राहावे लागेल याची शाश्वती नाही. प्राथमिक शिक्षक देखील गावात येऊ शकत नसल्याने मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांना जास्त पूर असल्यास तीन-तीन दिवस वाट बघावी लागते. दैनंदिन उपजीविकेसाठीचे अन्न धान्य संपले की उसनवारी करून काम धकवावे लागते, अशी व्यथा त्यांनी मांडली. अवघ्या शंभर मीटरवर असलेले डांगरी गाव त्या काळातील प्रगणे वसूल करणारे मुख्य गाव होते. तर क्रांतिकारक उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील, माजी मंत्री शिवाजीराव पाटील, अभिनेत्री स्मिता पाटील यांचे हे गाव. मात्र त्या काळापासून सात्री हे शेजारील गाव सुविधांपासून वंचित आहे.डांगरी आणि सात्री गावांमधील नदीचे क्षेत्र हे पाडळसरे धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात येते. दोन्ही गावे पूर्ण बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाने हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केला. तसेच धरण परिसरात पाण्यात उतरण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे. तसा फलक डांगरी गावाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. येथूनच सात्रीला जावे लागते. त्यामुळे पाण्यात उतरून पोहण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाही.बोरी नदीच्या सततच्या पुरामुळे रेशनचे धान्य सात्रीपर्यंत पोहचवता येत नाही. जिल्हा पुरवठा अधिका?्याशी चर्चा करून धान्य डांगरीपर्यंत पोहचविले जाईल. तेथून काहीतरी व्यवस्था करून सात्रीपर्यंत धान्य ग्राहकांपर्यंत पोहचविले जाईल.-मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर९ सप्टेंबरपासून गावातील १७ ते १८ घरे पडल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सततच्या पावसामुळे सात्री गावाला पंचनाम्यासाठी पोहचता येत नाही. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.- वाल्मिक पाटील, तलाठीहा खडतर प्रवास रोजचाच...खाटेवरून एखाद्या रुग्णाला अथवा व्यक्तीला आणण्यासाठी खाट डोक्यावर धरून नदीकाठच्या चिखल-काटे असलेल्या खोºयातून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला १ किमी अंतर जावे लागते. नंतर चार जण प्रवाहाच्या दिशेने पोहत पलीकडच्या तीरावर खाट पोहचवितात. परत पलीकडे खाट डोक्यावर धरून पुन्हा तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने कापून गावात परतावे लागते. अनवाणी जावे लागत असल्याने पायाला सरपटणारे प्राणी, घातक कीटक चावा घेण्याची भीती असते.