शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

पहिल्या दिवशी शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:27 IST

चोपडा तालुक्यात पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याने वर्ग कसे भरवावेत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

ठळक मुद्देपालकांचा संमती पत्र देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क

चोपडा : मंगळवारपासून दररोज इयत्ता ९ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळेत घंटा वाजली असली तरी विद्यार्थ्यांचा मात्र प्रतिसाद अत्यल्प असल्याने वर्ग कसे भरवावेत? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.वर्गात ५५ ते ६० मुले असतील तर केवळ पाच ते सात विद्यार्थी शाळेत आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना कोरोना प्रादूर्भाव होईल. म्हणून पाठविण्यास तयार नसल्याचे शाळांना कळविले आहे. म्हणून शाळा भरणे शासनाने सक्तीचे केले असले तरी मात्र स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेकडे पाठ फिरविली आहे.ज्या शाळांमध्ये पाच पाच तुकड्या एका वर्गाच्या आहेत, त्या शाळेत कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविणे अवघड झाले आहे. एका वर्गात केवळ २५ विद्यार्थी बसू शकतात तर मग चार तुकड्या असतील तर त्यासाठी या विद्यार्थ्यांना आठ वर्गात सोशल डिस्टन्स पाळून बसविले जाईल आणि एकच शिक्षकाला एकच टॉपिक आठ वेळा शिकवावे लागेल म्हणून नियमित शाळा सुरू होईल तरच शाळा सुव्यवस्थित भरतील अन्यथा शाळा प्रशासनास अडचणींचा सामोरा करावा लागेल, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाEducationशिक्षणSchoolशाळा