शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

‘वंदे मातरम्’ साठी 22 वर्षापूर्वी जळगावातून लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 12:10 AM

आठवणींना उजाळा : शिक्षकाचा पुढाकार

ठळक मुद्देशाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेशमातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा

ऑनलाईन लोकमत / चुडामण बोरसे  

जळगाव, दि. 7 -  गेल्याच आठवडय़ात ‘वंदे मातरम्’ वरुन राज्यात  मोठाच गदारोळ झाला होता. शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’  सक्तीचे करण्यात यावे, यासाठी जळगाव जिल्ह्यातील संजय चौधरी या  शिक्षकाने 22 वर्षापूर्वी न्यायालयीन लढा दिला होता. त्यामुळे या आठवणींना उजाळा मिळाला आहे.   एरंडोल तालुक्यातील कासोदा  येथील संजय आत्माराम चौधरी असे या शिक्षकाचे नाव. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधून ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करावे,  यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विनंती अर्ज (क्र.93/95) 26 जून 1995 केला होता.   त्यावर  खंडपीठाचे तत्कालीन अतिरिक्त रजिस्टार  जी.डी. पारेख यांनी न्यायालयाच्या अधीन राहून शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश 14 ऑगस्ट  1995 रोजी दिले होते. आजमितीस यास 22 वर्षे पूर्ण होत आहेत. यानंतर राज्याच्या तत्कालीन शिक्षण संचालकांनी 24 नोव्हेंबर 1995 रोजी शाळा आणि महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सुरु करण्याचे आदेश बजावले होते. या आदेशानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षण  समितीचे तत्कालीन सभापती पी.सी.पाटील यांनी ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचे आदेश मे 2005 मध्ये दिले होते. मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती अंगी बाणावी आणि मातृभूमीची महती सांगणारे राष्ट्रभक्ती निर्माण करणारे ‘वंदे मातरम्’ सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नियमित म्हटले जावे, यासाठी आपण 22 वर्षापूर्वी हा लढा दिला होता, राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा. आणि तो वेळोवेळी व्यक्त व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.  

अशी सुचली कल्पनाआकाशवाणीवर  रोज पहाटे दिवसाची सुरुवात ही ‘वंदे मातरम्’ या गीताने होत असते. मग शाळांमधून हे गीत का म्हटले जाऊ नये, असा विचार मनात आला. यासाठी आपण उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नाही. 15 ऑगस्ट 2017 पासून शाळा व महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सक्तीचे करावे.      - संजय आत्माराम चौधरी