शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

वैद्य एक पंढरीराव....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 9:56 PM

आता बरे घरीच्या घरी । आपली उरी आपणापे ।। १।।हे विश्वचि माझे घर! या संतवचनाप्रमाणे संपूर्ण विश्वाला घरी बसणे ...

आता बरे घरीच्या घरी । आपली उरी आपणापे ।। १।।हे विश्वचि माझे घर! या संतवचनाप्रमाणे संपूर्ण विश्वाला घरी बसणे हा एकच पर्याय सध्या कोरोना नावाच्या दृष्टिक्षेपात न येणाऱ्या परंतु प्रत्यक्ष प्राणघातक ठरणाºया विषाणूने आणली आहे. मानवी जीवन, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या पंचसूत्रीला बांधील आहे. कुठलाही समाज जोवर निरोगी नाही तोवर कुठलेही काम व्यवस्थित व उपयोगाचे ठरू शकत नाही. कारण आपल्या शरीरात राहणारे निरोगी बॅक्टरिया व रोगांची बॅक्टरिया यात झालेल्या चकमकीत प्रतिकारशक्ती निर्माण करणे आपल्यासाठी गरजेचे आहे. साधारणत: १९७५ पासून असे रोग, विषाणू उद्भवत आहेत की, ज्यांचा पूर्वी कुठेही उल्लेखही नव्हता. पण हे रोग येतात कुठुन हा संशोधनाचा मुद्दा आहे. संसर्गजन्य रोगांचे विशेषज्ञ म्हणतात की, जवळ जवळ सर्व संसर्गजन्य रोग जनावरांशी जास्त संपर्क आल्यामुळे होतात. मनुष्याचा मनुष्याशी वाढणारा संपर्क त्यात टीबी हा रोग शेळी, मेंढी यांच्या अति संपर्कातून २० व्या शतकात आला. गोवर आला तो गायी पाळल्यामुळे, गायीतील बोवाईन रिण्डरपेस्ट व्हायरसचा एक वेगळा प्रकार आहे. अर्थात गायीला गोवर होत नाही. महारोग पाणघोड्यामुळे तर सर्दी घोड्यामुळे आली. ‘कोरोना’ हा कसा झाला यात मतेमतांतरे आहेत. पण वटवाघुळमध्ये आढळणारा विषाणू माणसात आला, त्याला जागतिक आरोग्य संघटेनेने ‘कोविड-१९’ असे नाव दिले.आता यावर भौतिक, दैविक, आध्यात्मिक एकच पर्याय आहे, तो म्हणजे आहात त्या ठिकाणी थांबणे! पूर्वी थांबला तो संपला असे म्हटले जायचे, परंतु आज मात्र थांबला तो जिंकला अशी परिस्थिती आहे. त्यावरचा आध्यात्मिक उपाय म्हणजे - वैद्य एक पंढरीराव । अंतर्भाव जाणे तो ।।पथ्य नाम विठोबाचे ।। भगवान पंढरीधिश पांडुरंग हाच एकमेव वैद्य आहे की, जो आपल्याला या भीतीतून काढू शकेल. कारण माणूस भीतीने ग्रस्त झालाय.श्रीमंताला गरिबीची भीती, सौंदर्यवानाला म्हतारपणाची भीती विद्वानाला आडदांड प्रश्न विचारणाºयाची भीती, धनवानाला चोरांची भीती, ठरावीक भीती आहे परंतु मला मरणाची भीती नाही असा जगात शोधूनही सापडणार नाही. अशा परिस्थितीत मानवाने- ठायीची बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा।।प्रभुचिंतन हाच मानवी कल्याणाचा मार्ग आहे. एक दृढविश्वास मनात रुजविला पाहिजे की, जर एक न दिसणारा अप्रत्यक्ष विषाणू माणसाला मारु शकतो ही चिंता असेल तर न दिसणारा परमात्मा परमेश्वर माणसाला वाचवू श्कतो, हे चिंतन आहे. सर्वांनी विनंती इतर रोग माणसांच्या संसर्गातून संक्रमित होतात. पण हा रोग अगोदर आजारी नसलात, तरी त्यांचे संक्रमित, संवाहक ठरू शकतात. आपल्या देशाचा सारासार विचार करता घरात थांबणे हाच एक उत्तम पर्याय आहे.तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ।। याप्रमाणे शासन, प्रशासन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनावर मात करु या.नामाचे चिंतन प्रगट पसाराअसाल ते करा जेथे तेथे- ज्ञानेश्वर महाराज, जळकेकर

टॅग्स :Jalgaonजळगाव