शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७.५ लाख कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:40 PM

जळगाव जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा समावेश

ठळक मुद्देउज्ज्वला गॅस योजनेचा राज्यात साडे सतरा लाख कुटुंबाना लाभजळगाव जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ गरीब कुटुंबाना लाभ१ मे २०१६ रोजी प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१६ : पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा जिल्ह्यातील ९९ हजार ६०३ कुटुंबाना लाभ देण्यात आला. राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ लाभार्थ्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा या योजनेत अग्रेसर ठरला आहे.काय आहे उज्ज्वला गॅस योजना?केंद्र सरकारने १ मे २०१६ रोजी संपूर्ण भारतात प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला. या योजनेचा मूळ उद्देश भारतातील दारिद्र्य रेषेखालील सुमारे ५ कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा केंद्र्र शासनाने संकल्प केला आहे. महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाकासाठी लाकडी सरपण वापरल्यामुळे लहान बालक व महिलांना होणाºया श्वसनाच्या तक्रारी दूर करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.योजनेचा लाभ कसा मिळविणारयोजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने एलपीजी वितरण केंद्रावर अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अर्जासोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक आहे. सोबतच पंचायत अधिकारी, नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांनी अर्ज करणे आवश्यक आहे.९९ हजार ६०३ गरीब कुटुंबाना लाभया योजनेंतर्गत लाभ मिळावा यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार तयार केलेल्या बीपीएल यादीतील एक लाख ६ हजार २८१ कुटुंबांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.कर्ज व विनाकर्ज मिळतो लाभया योजनेत लाभार्थ्याला गॅस शेगडी, गॅसची रक्कम तसेच स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरावी लागते. मात्र काही कुटुंबांची ही रक्कम भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे शासन अशा ग्राहकांना शेगडीचे ९९० व गॅससाठी ७०० अशा १६९० रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशावेळी १०० रुपयात कनेक्शन दिले जाते. मात्र या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत लाभार्थ्याला सबसिडीचा लाभ मिळत नाही.राज्यात साडे सतरा लाख कुटुंबाना लाभपंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा राज्यातील १७ लाख ५५ हजार ६५८ कुटुंबांना लाभ मिळाला आहे. त्यातुलनेत जळगाव जिल्ह्यात ९९ हजार ६०३ लाभार्थी असल्याने जळगाव जिल्ह्याचे काम या योजनेत आघाडीवर आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यातील बीपीएलधारकांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत एक लाख ६ हजार २८१ लाभार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी ९९ हजार ६०३ कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा.-नीलेश लठ्ठे, नोडल अधिकारी, उज्ज्वला योजना

टॅग्स :Jalgaonजळगावprime ministerपंतप्रधान