शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नामांतर प्रक्रिया : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शासनाकडे पाठवावे लागणार दोन ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:08 PM

महाराष्ट्र दिनापूर्वी परिपत्रक निघण्याची अपेक्षा

ठळक मुद्दे२७ रोजी सिनेटच्या बैठकीत ठरावाची शक्यताखान्देशात आनंदोत्सव

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा झाल्यानंतर आता विद्यापाठीला दोन ठराव करून शासनाकडे पाठवावे लागणार आहे. या ठरावानंतर शासकीय परिपत्रक निघून अधिकृतरित्या नाव दिले जाईल. ही प्रक्रिया झाली तर एका महिन्यातही पूर्ण होऊ शकते, त्यामुळे १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापूर्वीच विद्यापीठाची नामकरण प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा २२ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व संपूर्ण खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला. नामकरणाची ही घोषणा झाली तरी यासाठी विद्यापीठस्तरावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.२७ रोजी सिनेटच्या बैठकीत ठरावाची शक्यतायामध्ये विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक घेऊन पहिला ठराव करावा लागणार आहे. त्यानंतर दुसरा ठराव सिनेटचा करावा लागेल. यामध्ये योगायोगाने २७ रोजी सिनेटची अर्थसंकल्पीय बैठक असून यासाठी आता वेगळी बैठक बोलवावी लागणार नाही. याच बैठकीत हा ठराव होण्याची शक्यता आहे.सिनेटपूर्वी व्यवस्थापन परिषदेचा ठराव करावा लागतो त्यामुळे २७ मार्च पूर्वी व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलवावी लागणार आहे. विद्यापाठीकडून हे दोन्ही ठराव झाल्यानंतर ते शासनाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर परिपत्रक निघून कायद्यात रुपांतर होईल.विद्यापीठाकडून दोन ठराव शासनाकडे पाठवावे लागतील, त्यानंतर कायदा होऊन नामांतर होईल.- दिलीप रामू पाटील, सदस्य, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद.विद्यापीठाच्या दोन्ही ठरावानंतर नामांतर होईल. ही प्रक्रिया महाराष्ट्र दिनापूर्वी व्हावी, अशी अपेक्षा आहे.- अनिल राव, सदस्य, विद्यापीठ कायदा मसुदा समिती.

टॅग्स :Jalgaonजळगावuniversityविद्यापीठ