अमळनेत तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:30 IST2019-03-15T23:30:20+5:302019-03-15T23:30:34+5:30
गळफास

अमळनेत तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या
अमळनेर : दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ रोजी तालुक्यातील मांडळ व शहरातील आर.के. नगर भागात घडली
आर.के. नगर भागातील भावना दीपक पाटील (वय ३२) या महिलेने १५ रोजी दुपारी साडेबारा वाजेपूर्वी स्वत:च्या राहत्या घरी छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जितेंद्र साहेबराव पवार यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत. भावना यांच्या पश्चात पती, अडीच वर्षाचा मुलगा आहे.
दरम्यान, अमळनेर तालुक्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आठवडाभरात चार जणांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
मांडळ येथील आंबेडकरनगर मधील सोनाली राजू कांबळे (वय २०) या महिलेने दुपारी २ वाजेपूर्वी घराच्या वरच्या मजल्यावर छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस पाटील भास्कर चैत्राम पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण करीत आहेत. सोनाली हीचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला असून तिचे पती डॉक्टर आहेत.