शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

हनूतर धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:06 IST

२७,४७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ४.१९ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडले असून धरणातून बुधवारी २७ हजार ४७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ९३.४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची १५१.४ मिमी पाऊस जामनेर तालुक्यात तर सर्वात कमी ५५.६ मिमी पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, अभोरा, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा एक हजार ४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा एक हजार २७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी इतका असून बुधवारअखेर या प्रकल्पांमध्ये ११८.७९ दलघमी म्हणजेच ४.१९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.६८ टीएमसी, गिरणा १.३७ टीएमसी तर वाघूर धरणात १.१४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.जळगावची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास होणार मदतवाघूर धरणाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी ३ जुलैपर्यंत ९५ मिमी पाऊस पडला होता. तर यावर्षी ३ जुलैपर्यंत १३९ मिमी पाऊस पडल्याने जळगाव शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गेल्या २४ तासात हतनूर धरण क्षेत्रात १० मिमी, गिरणा धरण क्षेत्रात ८ मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात ५ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून ३ जुलैअखेर या प्रकल्पांमध्ये १४.८२ दलघमी म्हणजेच ०.५२ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.वार्षिक सरासरीच्या १४.१ टक्के पाऊसगेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. जिल्ह्याच्या काही भागात दररोज पडणारा पाऊस काही तालुक्यातील पेरणीला पुरक ठरत असून काही तालुक्यातील पिकांना जीवदान मिळण्यास मदत होत आहे. बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने ३ जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३.४ टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर असून मागील वर्षी ३ जुलै २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या १८.६ टक्के म्हणजेच १२२.७ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी फक्त ९३.४ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या केवळ १४.१ टक्के इतका पाऊस झाला आहे.जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता ३ जुलैपर्यंत सर्वाधिक १५१.४ टक्के पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ५५.६ टक्के पाऊस अमळनेर तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात ३ जुलै रोजी एका दिवसात १७.२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.३ जुलैपर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (कंसात वार्षिक सरासरीशी टक्केवारी)जळगाव - ७४.३ मिलीमीटर (१०.८ टक्के), जामनेर- १५१.४ मि.मी., (२१.०), एरंडोल- १२७.५ मि.मी. (२०.५), धरणगाव - ७२.९ मि.मी. (११.७), भुसावळ - ८२.० मि.मी. (१२.३), यावल - ८५.६ मि.मी. (१२.३), रावेर - ९०.१ मि.मी. (१३.५), मुक्ताईनगर - १३१.२ मि.मी. (२१.०), बोदवड - १२५.६ मि.मी. (१८.८), पाचोरा - १२५.५ मि.मी. (१६.९), चाळीसगाव - ८२.१ मि.मी. (१२.४), भडगाव - ६५.९ मि.मी. (९.८) अमळनेर - ५५.६ मि.मी. (९.६), पारोळा - ६५.२ मि.मी. (१०.३), चोपडा - ६५.८ मि.मी. (९.५) याप्रमाणे जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या २.९ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव