शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

दिवसभरात ५० वेळा रेल्वे गेट होते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:17 IST

पिंप्राळा रेल्वे गेट : दर दहा मिनिटाला गेट बंद होते, जळगावकर अनेक वर्षांपासून करताहेत गैरसोयीचा सामना

जळगाव : दर पाच ते दहा मिनिटाला रेल्वेगाडी जात असल्यामुळे पिंप्राळा रेल्वे गेट बंद करण्यात येते. दिवसभरात ५० ते ६० वेळा हे गेट बंद होत असून, कितीही घाई असली अन् आपत्कालीन परिस्थिती असली तरी वाहनधारकांना गाडी निघेपर्यंत ताटकळतच थांबावे लागते. मात्र, कित्येक वर्षापासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे अद्याप याठिकाणी उड्डाणपुल न झाल्यामुळे वाहनधारकांकडून तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर हे पिंप्राळा गेट असून, या ठिकाणाहून दररोज २४ तास गाड्यांची वर्दळ सुरु असते. शहराची निम्मेवस्ती पिंप्राळा गेटच्या त्या बाजूला ये-जा करीत असल्याने दिवस-रात्र लाखो नागरिक या गेटवरुन ये-जा करित असतात. त्यातच २४ रेल्वेगाड्या येथून जात असल्याने हे गेट जवळपास ५० ते ६०वेळा बंद करावे लागते. गाडी गेल्यानंतर गेटमनतर्फे लगेच गेट उघडण्यात येते. मात्र, दुसरी गाडी येणार असल्याने पाच ते दहा मिनिटांत पुन्हा गेट बंद करण्यात येते. गेल्या ५० ते ६० वर्षांहून अधिक काळापासून हा नित्यक्रम आहे. परंतु, अलीकडील काही वर्षांत भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढल्यामुळे, या परिसरातील रहिवाशांना दर दहा मिनिटाला होणारा गेट बंदचा त्रास नकोसा झाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी उड्डाणपुलाची चर्चा ऐकण्यात येत असून, अद्याप या ठिकाणी एक वीटही रचण्यात न आल्यामुळे जळगावकरांतर्फे याबाबत तीव्र नाराजी अन् संताप व्यक्त करण्यात येत आहे.५ किलोमीटर अंतरावर गाडी असतांना गेट होते बंददर पाच ते दहा मिनिटाला होणाऱ्या गेट बंदबाबत येथील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी अप किंवा डाऊन मार्गावरुन गाडी येत असतांना, नियंत्रण कक्षातून सावधान राहण्याची सूचना येते. रेल्वेगाडी साधारणत: पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असतांना, लगेच गेट बंद करण्यात येते. गेट बंद केल्यावर कुठलीही आपत्कालीन परिस्थती असली तरी, रेल्वेगाडी गेल्यानंतरच गेट उगडले जाते. रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेच्या नियमानुसारच हे काम चालत असल्याचे येथील गेटवर काम करणाºया कर्मचाºयांनी सांगितले.त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच‘लोकमत’ प्रतिनिधीने पिंप्राळा गेटवर गाडी निघण्याची वाट पाहत असलेल्या वाहनधारकांशी संवाद साधला असता, अनेकांनी कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या त्रासाचा कंटाळा आला असल्याचे सांगितले. मात्र, कायं करणार? त्रास सहन करण्याची आम्हाला सवयच झाली असल्याचेही या वाहनधारकांनी सांगितले. कितीही घाई आणि आपत्कालीन परिस्थती असली तरी, या ठिकाणी थाबांवेच लागते. कधीकाळी गेट उघडे राहिले तर बरे वाटते अन्यथा दररोज या ठिकाणी दहा मिनिटांचा वेळ वाया जातोच. वाहनधारकांचा हा त्रास नवीन नसून, अनेक वर्षांपासून आहे. मात्र, तरीदेखील मनपा प्रशासनाने वा कुठल्याही राजकीय नेत्याने याकडे लक्ष दिले नसल्याबद्दल वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव