शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:19 IST

शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण म्हणाले...हे तर मस्तवाल सरकारराज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूसरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : शेतकरी, शेतमजुर यांची महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा काँग्रेसचे व्हीजन २०१९ या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा सरकार घोषणा करीत असताना अंमलबजावणी मात्र करीत नाही. या सरकारला कधी खाली खेचू या भूमिकेत सर्वसामान्य जनता आहे. उद्योग आणि आर्थिक यशाचे शिखरे गाठणारा महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत उच्चांक गाठत आहे. महाविद्यालयातून प्रत्येक वर्षाला अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र हे सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले आहे.सरकारच्या विरोधात बोलल्यास तुमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत असते. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सारखी स्थिती आहे. यासाºयात काँग्रेसची भूमिका काय? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे तर मस्तवाल सरकारगेल्या वेळी काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे निराश नाही. सत्ता ही येत-जात राहते. मात्र बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू ही मस्तवाल भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे या सरकारविरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.राज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूभाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाची राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आतापासून चाचपणी करीत आहेत. राज्यघटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाहीभाजपा व शिवसेनेला सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजून त्यांना सरकार कसे चालवावे हे समजत नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस