शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:19 IST

शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण म्हणाले...हे तर मस्तवाल सरकारराज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूसरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : शेतकरी, शेतमजुर यांची महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा काँग्रेसचे व्हीजन २०१९ या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा सरकार घोषणा करीत असताना अंमलबजावणी मात्र करीत नाही. या सरकारला कधी खाली खेचू या भूमिकेत सर्वसामान्य जनता आहे. उद्योग आणि आर्थिक यशाचे शिखरे गाठणारा महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत उच्चांक गाठत आहे. महाविद्यालयातून प्रत्येक वर्षाला अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र हे सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले आहे.सरकारच्या विरोधात बोलल्यास तुमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत असते. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सारखी स्थिती आहे. यासाºयात काँग्रेसची भूमिका काय? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे तर मस्तवाल सरकारगेल्या वेळी काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे निराश नाही. सत्ता ही येत-जात राहते. मात्र बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू ही मस्तवाल भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे या सरकारविरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.राज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूभाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाची राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आतापासून चाचपणी करीत आहेत. राज्यघटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाहीभाजपा व शिवसेनेला सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजून त्यांना सरकार कसे चालवावे हे समजत नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस