शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

आत्महत्या करण्यासाठी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहचतात तरी या सरकारला संवेदना नाही : खासदार अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:19 IST

शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण म्हणाले...हे तर मस्तवाल सरकारराज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूसरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाही

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२४ : शेतकरी, शेतमजुर यांची महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत धाव घेत आहे तरी देखील या सरकारला संवेदना नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी जळगावात केले.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हा काँग्रेसचे व्हीजन २०१९ या शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा सरकार घोषणा करीत असताना अंमलबजावणी मात्र करीत नाही. या सरकारला कधी खाली खेचू या भूमिकेत सर्वसामान्य जनता आहे. उद्योग आणि आर्थिक यशाचे शिखरे गाठणारा महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत उच्चांक गाठत आहे. महाविद्यालयातून प्रत्येक वर्षाला अनेक विद्यार्थी बाहेर पडत आहेत. मात्र हे सरकार त्यांना रोजगार देण्यासाठी अपयशी ठरले आहे.सरकारच्या विरोधात बोलल्यास तुमच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी हे सरकार करीत असते. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सारखी स्थिती आहे. यासाºयात काँग्रेसची भूमिका काय? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.हे तर मस्तवाल सरकारगेल्या वेळी काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे निराश नाही. सत्ता ही येत-जात राहते. मात्र बहुमताच्या बळावर आम्ही काहीही करू ही मस्तवाल भूमिका या सरकारची आहे. त्यामुळे या सरकारविरोधात संघर्ष करण्याची आवश्यकता आहे.राज्यघटनेतील बदलाचा डाव हाणून पाडूभाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशाची राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते आतापासून चाचपणी करीत आहेत. राज्यघटनेला धक्का लावण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.सरकार कसं चालवाव हे त्यांना कळत नाहीभाजपा व शिवसेनेला सत्तेत येऊन तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र अजून त्यांना सरकार कसे चालवावे हे समजत नाही.

टॅग्स :JalgaonजळगावAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस