शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:08 IST

साहित्यिक अशोक कौतिक कोळी यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

रवींद्र मोराणकरजळगाव : आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित- नावाजलेल्या कलावंत, साहित्यिक, आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्र्चिले जायला हवे. याचा आढावा घेणारी मुलाखत.एक कलावंत म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?सध्याची लोकसभा निवडणूक ही मला घाई-गडबडीची, राजकीय पक्षांच्या लुटूपुटूची लढाई वाटते. त्यात ठरवून मतदारांची दिशाभूल सुरू आहे का काय, असे वाटते. असंबद्ध मुद्दे व वैयक्तिक टीकाटिपणी करून मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताना दिसताहेत. त्यामुळे मतदारांची करमणूक होताना दिसत आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?याऐवजी निवडणुकीत देशहिताचे व समाजहिताचे मुद्दे असायला हवेत. ज्यातून जनतेचे हित, देशाचा विकास, देशातील समाजाचे उन्नत प्रतिबिंब उमटायला हवे व निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. समाजाच्या व देशाच्या आजच्या आशा-आकांक्षा काय आहेत, हे खरं तर निवडणुकीतील मुद्यांमधून डोकायला हवे. ध्येयवाद मला या निवडणुकीत दिसून येत नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?हल्ली साहित्य, कला क्षेत्राला सर्वच पक्ष बेदखल करताना दिसताहेत. विचारवंत, साहित्यिक यांना अडगळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. वास्तविक निकोप समाजस्वास्थ्यासाठी साहित्य, कला क्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विकास म्हणजे केवळ दगड विटांची बांधकामे नव्हे. निकोप मनाचा नागरिक उन्नत देश घडवू शकेल. निकोप मनाच्या घडणीसाठी निकोप साहित्य, सांस्कृतिक वातावरण हवे. अभिव्यक्तीचा संकोच होता कामा नये.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्याद्वारे आपला आशाआकांक्षांना सत्यात उतरवण्याची व आपल्या स्वप्नातील देश घडवणाऱ्या धुरीणांना निवडण्याची संधी असते. त्याचा वापर जरूर करावा.

टॅग्स :Jalgaonजळगाव