शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:08 IST

साहित्यिक अशोक कौतिक कोळी यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

रवींद्र मोराणकरजळगाव : आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित- नावाजलेल्या कलावंत, साहित्यिक, आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्र्चिले जायला हवे. याचा आढावा घेणारी मुलाखत.एक कलावंत म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?सध्याची लोकसभा निवडणूक ही मला घाई-गडबडीची, राजकीय पक्षांच्या लुटूपुटूची लढाई वाटते. त्यात ठरवून मतदारांची दिशाभूल सुरू आहे का काय, असे वाटते. असंबद्ध मुद्दे व वैयक्तिक टीकाटिपणी करून मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताना दिसताहेत. त्यामुळे मतदारांची करमणूक होताना दिसत आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?याऐवजी निवडणुकीत देशहिताचे व समाजहिताचे मुद्दे असायला हवेत. ज्यातून जनतेचे हित, देशाचा विकास, देशातील समाजाचे उन्नत प्रतिबिंब उमटायला हवे व निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. समाजाच्या व देशाच्या आजच्या आशा-आकांक्षा काय आहेत, हे खरं तर निवडणुकीतील मुद्यांमधून डोकायला हवे. ध्येयवाद मला या निवडणुकीत दिसून येत नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?हल्ली साहित्य, कला क्षेत्राला सर्वच पक्ष बेदखल करताना दिसताहेत. विचारवंत, साहित्यिक यांना अडगळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. वास्तविक निकोप समाजस्वास्थ्यासाठी साहित्य, कला क्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विकास म्हणजे केवळ दगड विटांची बांधकामे नव्हे. निकोप मनाचा नागरिक उन्नत देश घडवू शकेल. निकोप मनाच्या घडणीसाठी निकोप साहित्य, सांस्कृतिक वातावरण हवे. अभिव्यक्तीचा संकोच होता कामा नये.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्याद्वारे आपला आशाआकांक्षांना सत्यात उतरवण्याची व आपल्या स्वप्नातील देश घडवणाऱ्या धुरीणांना निवडण्याची संधी असते. त्याचा वापर जरूर करावा.

टॅग्स :Jalgaonजळगाव