शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"जरांगेंवर मुंबईत उपोषणाला बसण्याची वेळच येणार नाही", गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 20:00 IST

मंत्री गिरीश महाजन शनिवारी जामनेरात होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

- प्रशांत भदाणे 

जळगाव - "मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णय देताना सरकारची बाजू ऐकून घेण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे एक विंडो ओपन झाली आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगेंवर मुंबईत उपोषणाला बसण्याची वेळच येणार नाही", अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

मंत्री गिरीश महाजन शनिवारी जामनेरात होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. मंत्री महाजन पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णय देताना सरकारची बाजू ऐकून घेण्याचा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालय 24 जानेवारीला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची बाजू ऐकून घेणार आहे. ही आपल्यासाठी सकारात्मक आणि जमेची बाजू आहे. 

आपण मागासवर्गीय आयोग नेमला आहे. त्या माध्यमातून आपण त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठंही त्रुटी राहू नयेत म्हणून आपण प्रयत्न करत आहोत. आपण नेमलेला मागासवर्गीय आयोग जोमाने काम करत आहे. मराठा समाजातील जे उपेक्षित घटक आहेत, त्यांचा अभ्यास केला जात आहे. या संदर्भातील सारे कागदपत्रे आपण सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू. क्युरेटिव्ह पिटीशन ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपल्याला शंभर टक्के आरक्षण देईल, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला न्यायालयासमोर टिकणारं, कायमस्वरूपी आरक्षण आम्हाला द्यायचं आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, जरांगे पाटलांनी आईचं नाव लावण्यासंदर्भात केलेल्या मागणीबाबतही गिरीश महाजन यांनी मत मांडलं. ते म्हणाले की, आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे. वडिलांचीच जात लावली जाते. त्यामुळे आईचं नाव लावणं कदापि शक्य नाही, असे म्हणत गिरीश महाजन यांनी जरांगेंच्या मागणीला विरोध दर्शवला.

विशेष अधिवेशन बोलावू, कायदा पारित करू फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सरकार मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा पारित केला जाईल, असेही गिरीश महाजन म्हणाले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण