शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाई ला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळा तोंडावर आला असतानादेखील शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या साफसफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही. महापालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळा तोंडावर आला असतानादेखील शहरातील मुख्य पाच नाल्यांच्या साफसफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही. महापालिकेने नाल्यांचा सफाईसाठी निविदा प्रक्रिया राबवली असली तरी अद्यापही ठेकेदाराला कार्यादेश दिले नसल्याने मुख्य नाल्यांच्या साफसफाईला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. दुसरीकडे उपनाल्यांची साफसफाई सुरू असली, तरी या नाल्याची सफाई करून काढण्यात आलेली घाण पुन्हा नाल्या लगतच टाकली जात आहे.

दरवर्षी मान्सूनआधी महापालिकेकडून शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत असते. मात्र यावर्षी महापालिका प्रशासनाची मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे नियोजन काही प्रमाणात कोलमडलेले दिसून येत आहे. उपनाल्यांच्या साफसफाईला वेळेवर सुरुवात झाली मात्र मुख्य नाल्यांच्या सफाईकडे मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात ७ जूननंतर मान्सूनचे आगमन होत असते. त्याआधीच मनपा प्रशासनाने मान्सूनचे नियोजन करणे अपेक्षित असते. मात्र, मनपा प्रशासनाचे मान्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

पाऊस झाल्यास नाल्यालगतच्या वस्तीमध्ये घुसते पुराचे पाणी

शहरात २३ किमी लांबीचे ५ मोठे नाले आहेत. या पाच प्रमुख नाल्यांसह ७० उपनाले आहेत. सफाईची मोहीम पावसाळ्यापूर्वी केली जाते. या नाल्यामधील सर्व गाळ व कचरा काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीपासून करण्यात येते. मात्र पावसाळा दोन आठवड्यावर असतानादेखील शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईचे काम सुरु झालेले नाही. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास नाले तुंबून परिसरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका निमाण झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसामध्येदेखील गेल्या काही वर्षांमध्ये घरांमध्ये पाणी शिरण्याची घटना देखील घडल्या आहेत. या घटनांपासून महापालिका प्रशासनाने अद्यापही बोध घेतलेला दिसून येत नाही. महापालिका प्रशासनाने १७ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली असून, ठेकेदार देखील निश्चित करण्यात आले आहेत.मात्र ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आलेले नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

नाल्यावरील अतिक्रमण मोहिमेला '' खो ''

सप्टेंबर २०१४ मध्ये जळगावात अतिवृष्टीने शहारातील नाले व मेहरूण तलावाजवळील रहिवासी भागांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. शहरातील जवळपास २५ टक्के भागात ३ ते ५ फुटांपर्यंत पाणी शिरले होते. या आपत्कालीन परि‌स्थितीस शहरातील नाल्यांवर असलेली बांधकामे व अतिक्रमणे कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महापालिकेला नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. दरवर्षी मान्सूनपूर्व कामांचे नियोजन होत असतांना नाल्या लगत असलेले अतिक्रमण काढण्याचा सूचना या दिल्या जातात मात्र आतापर्यंत मनपा प्रशासनाने नाल्या लगत असलेल्या अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नगर रचना विभगाने नाल्या लगत असलेल्या अतिक्रमणांचे मूल्यांकन देखील केले होते. मात्र मनपा प्रशासनाने अद्यापही याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

शहरातील ८ नाल्यांना विळखा

जळगावात ८ नाले त्यात ५ प्रमुख नाले आहेत. सुमारे २५ क‌ि.मी. लांबीचे हे नाले आहेत. नाल्यांची रुंदी २५ मीटर ते ६० मीटर पर्यंत आहे. या नाल्यांशी बांधकामासाठी केलेल्या छेडखानीम‍ळे पाण्याला वाहून जाण्यास जागा मिळत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. गोपाळ पुरा, मेहरुन, शनिपेठ या भागातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे.

कोट..

काही दिवसांपासून वैयक्तिक कामासाठी मी रजेवर आहे. मात्र सोमवारी महापालिकेत गेल्यानंतर याबाबतची संपूर्ण माहिती देऊ शकतो.

- पवन पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा