शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:14 IST

मंगळवारी दुपारी १२ वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात खान्देशासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरु केली.

ठळक मुद्देचाळीसगावात राष्ट्रवादीची आढावा बैठक परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी घेतली कार्यकर्त्यांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कार्यकारणी किती सदस्यांची आहे. यापेक्षा त्यात सामान्य माणसासाठी काम करणारे किती आहेत. याला महत्व असून ज्यांच्याकडे पक्षाचे काम करण्यासाठी वेळ नाही. त्यांना पदावरुन दूर करा. मनापासून काम करणाऱ्यांना संधी द्या. असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजेरी घेतली. कानपिचक्याही दिल्या. गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून बजावले.

मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांनी येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार मनिष जैन, अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदीप देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब खान, युवती प्रदेशाध्यक्ष सक्सेना सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कैलास सूर्यवंशी, प्रमोद पाटील, कल्पना पाटील, डॉ. संजीव पाटील, उमेश नेमाडे, किसनराव जोर्वेकर, रिता बाविस्कर आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी शहर व तालुका आणि विद्यार्थी, महिला अशा सर्व कार्यकारणी सदस्यांची हजेरीच घेतली. प्रत्येक विभागाच्या तालुका व शहराध्यक्षांना व्यासपिठावर बोलावून किती सदस्य हजर आहेत. त्यांना हातवर करण्यास सांगितले. जे सदस्य अनुस्पस्थित आहेत. त्यांना पदावरुन दूर करुन काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांला पक्षाशी जोडा, असे सांगितले. सूत्रसंचालन दिनेश पाटील व रामचंद्र जाधव यांनी केले.

पराभवाचा संघटनात्मक पातळीवर विचार करा...

चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. धनशक्ती किंवा जनशक्ती असे ठोकताळे बांधण्यापेक्षा संघटनात्मक पातळीवर विचार करा. पक्ष संघटना मजबूत करण्यावर काम करा. जनता - जनार्दन योग्य निर्णय घेईल. आत्तापासून कामाला लागल्यास २०२४च्या निवडणुकीत यश मिळेलच, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

नाथाभाऊंनी वेळ घेतला, मीही संयम ठेवला

एकनाथ खडसे यांनी या परिसरात मोठे काम केले आहे. त्यांनी जो पक्ष वाढवला. तो सोडून देणे त्यांना मानवत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीत येण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा अवधी घेतला. आमचेही प्रयत्न सुरुच होते. अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मीदेखील संयम ठेवला. असे सांगत जयंत पाटील यांनी 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा..' अशी मिश्किलीही केली. जिल्ह्यात पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. त्यामुळे २०२४च्या विजयासाठी आजच संकल्प करा. असे आवाहनही त्यांनी केले.

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या !

यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनाही बोलते केले. कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या. पक्षात पुढे पुढे करणाऱ्यांना संधी मिळते. काम करणारा निष्ठावान मागेच राहतो. चमकोगिरी करणारे पुढे येतात. सामान्य माणसात मिसळणाऱ्या, त्यांची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी उपलब्ध करुन द्यावी. अशा सुचना केल्या. याची योग्य दखल घेतली जाईल, असे मंत्री पाटील यांनी अश्वस्त केले.

टॅग्स :JalgaonजळगावJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव