शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:14 IST

मंगळवारी दुपारी १२ वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात खान्देशासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरु केली.

ठळक मुद्देचाळीसगावात राष्ट्रवादीची आढावा बैठक परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी घेतली कार्यकर्त्यांची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : कार्यकारणी किती सदस्यांची आहे. यापेक्षा त्यात सामान्य माणसासाठी काम करणारे किती आहेत. याला महत्व असून ज्यांच्याकडे पक्षाचे काम करण्यासाठी वेळ नाही. त्यांना पदावरुन दूर करा. मनापासून काम करणाऱ्यांना संधी द्या. असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची हजेरी घेतली. कानपिचक्याही दिल्या. गोरगरिबांच्या पायाला हात लावल्याशिवाय विधानसभेत यश मिळत नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवर्जून बजावले.

मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांनी येथील राजपूत लोकमंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार मनिष जैन, अनिल गोटे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदीप देशमुख, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब खान, युवती प्रदेशाध्यक्ष सक्सेना सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कैलास सूर्यवंशी, प्रमोद पाटील, कल्पना पाटील, डॉ. संजीव पाटील, उमेश नेमाडे, किसनराव जोर्वेकर, रिता बाविस्कर आदी उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी शहर व तालुका आणि विद्यार्थी, महिला अशा सर्व कार्यकारणी सदस्यांची हजेरीच घेतली. प्रत्येक विभागाच्या तालुका व शहराध्यक्षांना व्यासपिठावर बोलावून किती सदस्य हजर आहेत. त्यांना हातवर करण्यास सांगितले. जे सदस्य अनुस्पस्थित आहेत. त्यांना पदावरुन दूर करुन काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांला पक्षाशी जोडा, असे सांगितले. सूत्रसंचालन दिनेश पाटील व रामचंद्र जाधव यांनी केले.

पराभवाचा संघटनात्मक पातळीवर विचार करा...

चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. धनशक्ती किंवा जनशक्ती असे ठोकताळे बांधण्यापेक्षा संघटनात्मक पातळीवर विचार करा. पक्ष संघटना मजबूत करण्यावर काम करा. जनता - जनार्दन योग्य निर्णय घेईल. आत्तापासून कामाला लागल्यास २०२४च्या निवडणुकीत यश मिळेलच, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

नाथाभाऊंनी वेळ घेतला, मीही संयम ठेवला

एकनाथ खडसे यांनी या परिसरात मोठे काम केले आहे. त्यांनी जो पक्ष वाढवला. तो सोडून देणे त्यांना मानवत नव्हते. त्यांनी राष्ट्रवादीत येण्यासाठी सहा ते आठ महिन्याचा अवधी घेतला. आमचेही प्रयत्न सुरुच होते. अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मीदेखील संयम ठेवला. असे सांगत जयंत पाटील यांनी 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा..' अशी मिश्किलीही केली. जिल्ह्यात पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. त्यामुळे २०२४च्या विजयासाठी आजच संकल्प करा. असे आवाहनही त्यांनी केले.

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या !

यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनाही बोलते केले. कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या. पक्षात पुढे पुढे करणाऱ्यांना संधी मिळते. काम करणारा निष्ठावान मागेच राहतो. चमकोगिरी करणारे पुढे येतात. सामान्य माणसात मिसळणाऱ्या, त्यांची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाने संधी उपलब्ध करुन द्यावी. अशा सुचना केल्या. याची योग्य दखल घेतली जाईल, असे मंत्री पाटील यांनी अश्वस्त केले.

टॅग्स :JalgaonजळगावJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव