शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 17:12 IST

Uddhav Thackeray Speech Jalgaon : उद्धव ठाकरे म्हणाले, हरणार म्हणजे हारणारच... २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही.

येणाऱ्या २०२४ नंतर हे सरकार केंद्रात आणि देशात राहत नाही, ठेवायचं नाही. हरणार म्हणजे हारणारच. हे त्यांनाही कळलेले आहे. आता लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या समोर आता दोनच पर्याय आहे. एक तर, सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलेला, तो सर्वात घातक पर्याय आहे. सत्यपाल मलिक म्हणाले की, तो पुलवामातील हल्ला यांनीच घडवला होता. म्हणजे तुम्ही निवडणुकीसाठी माझ्या देशातील जवानांच्या जीवाशी खेळत आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. एवढेच नाही, तर राम मंदिराच्या उद्घाटनानंतर, परतांना गोध्रा घडवण्याचा डाव असू शकतो, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते जळगाव येथे एका सभेला संबोधित करत होते.

युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही -"जो जवान या भारत मातेच्या रक्षणासाटी गोळी खायला तयार असतो. त्याचा जीव तुम्ही तुमच्या राजकारणासाठी घेऊ शकता. सर्जिकल स्ट्राइकसुद्धी  तुम्ही करू शकता?  युद्ध हे देशासाठी करायचे असते, निवडणुकीसाठी नाही. सैन्य, जवान हे देशासाठी असतात, ते तुमच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसतात," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, "ते एकतर तसा तमाशा करू शकता किंवा त्याही पेक्षा जो घातक मुद्दा सत्यपाल मलिक आणि महुआ मोइत्रा यांनी सांगितलाय, की येत्या काही दिवसांत राम मंदिराचं उद्घाटन होईल. तारीख ठरतेय. मला कुणी सांगितले की, शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवाशी २३ जानेवारीला करतायत. म्हटले चांगले आहे, स्वागत आहे, पण डाव असा असू शकतो की, राम मंदिरासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने हिंदू बोलवायचे. बस गाड्या ट्रेनमधून यायचं आणि कार्यक्रम झाल्यानंतर, परततांना मधेच कुठे तरी गोध्रा घडवायचा. करू शकतात, हल्ला होऊ शकतो. कोणत्या तरी वस्तीत बस जाळतील, दगडफेक करतील, माणसं मारतील. पुन्हा देश पेटेन, पुन्हा घरांच्या होळ्या पेटतील आणि त्या पेटलेल्या घरांच्या होळ्यांवर त्यांच्या राजकीय पोळ्या ते भाजतील. हे सर्व त्यांचे डावपेच आहेत." 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAyodhyaअयोध्या