शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नारदाच्या गादीवर पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:54 IST

शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे

जळगाव - एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडला आहे. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या जागेवर उभे राहून विवेचन करतात, त्याला नारदाची गादी म्हटले जाते, पोलीस निरीक्षक महोदयांनी या मानाच्या गादीचाही अपमान केला. पायात बूट घालून ते गादीवर उभे राहिल्याने वारकरी संप्रदाय संतप्त झाला होता. याप्रकरणी आता पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. 

शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर, त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वारकरी संप्रदायाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यानंतर, पाटील यांनी अनावधानाने ही चूक घडल्याचे सांगत जाहीरपणे माफी मागतली आहे. 

''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वाजविण्यात बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन व्हावे, यासाठी मी मंदिरात सुरू असेलल्या किर्तनाकडे गेलो होते. त्यावेळी, अंगावर वर्दी असल्याने पायतही बुट होते. मी माईककडे गेलो, त्यावेळी माझा पाय माईकच्या खाली असलेल्या असलेल्या नारदाच्या गादीवर पडला. या गादीचं महत्त्व किंवा ती नारदाची गादी आहे, हे माहिती नसल्याने कर्तव्य बजावत असताना माझ्याकडून गादीवर चुकून बुटासह पाय पडला. माझ्याकडून या अनावधानाने घडलेल्या कृत्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सध्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छोटा स्पीकर लावला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता चाळीसगावात पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही घटनांमधून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे, हे मात्र नक्की. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसvarkariवारकरीChalisgaonचाळीसगाव