शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लाल परीतून शैक्षणिक सहलींचा यंदा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 23:39 IST

विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे.

जळगाव : हिवाळा आला की शैक्षणिक सहलींना सुरवात होते. शैक्षणिक संस्थाकडून खासगी ट्रॅव्हल तसेच एसटीला पसंती दिली जाते. त्यात एसटी महामंडळ ५० टक्के तिकीट दरात सूट देत असल्याने यावर्षी सहलींचे प्रमाण वाढणार आहे. डिसेंबर महिन्यात जळगाव विभागातील विविध आगारांतून सुमारे ५५ बसमधून विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला आहे. तसेच, विभागीय कार्यालयाकडे आगामी काळात सहलीसाठी बस बुक करण्याचे नियोजन जळगाव विभागातील आगारात करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. यामुळे शाळांना एसटीच्या एकूण तिकीट दरात प्रतिकिलोमीटर ५५ रुपयांऐवजी २६ रुपयेच मोजावे लागतात. दरम्यान, उर्वरित ५० टक्के तिकिटाचा महसूल राज्य शासनामार्फत एसटीकडे जमा होतो. त्यामुळे या सवलतीचा जिल्ह्यातील शाळांना फायदा घेता येणार आहे.

मागील वर्षीपेक्षा संख्या वाढणार...

२०२२-२३ मध्ये विभागातील अकरा आगाराच्या बस सहलीसाठी सोडण्याचा निर्णय जळगाव विभागीय कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त बस सहलीसाठी धावणार असल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी