शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

जळगाव : सीमा तपासणी केंद्राचा ‘ताप’, केळी उत्पादकांमध्ये संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:44 IST

​​​​​​​खासगी यंत्रणेकडून दंडात्मक कारवाईची भीती : शेतकऱ्यांनी केला विरोध

कुंदन पाटील

जळगाव : चोरवड (रावेर) येथे सीमा तपासणी केंद्र कार्यान्वीत होत आहे. खासगी ठेक्यातून चालविणाऱ्या जाणाऱ्या या तपासणी केंद्राचा सर्वाधिक फटका रावेर भागातील केळी उत्पादकांना बसणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईवरुन खासगी यंत्रणेशी सातत्याने वाद होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

राज्यात २२ सीमा तपासणी नाक्यांना बांधा, वापरा व हस्तांतरण (बीओटी) या तत्वावर मान्यता देण्यात आली आहे.वजन, डाटा एन्ट्री, पडताळणी, माल चढाई, वाहनतळ आदी सेवा या नाक्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्यानुसार चोरवड येथील तपासणी केंद्राची यंत्रणा खानापूर परिसरात कार्यान्वीत होणार आहे. दोन दिवसात ही यंत्रणा वाहनांची तपासणी करणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

केळीच्या वाहनांना त्रासया परिसरातील उत्पादक केळीची उचल करुन व्यापाऱ्याकडे आणतात. हा हंगामी प्रवास शासकीय यंत्रणेला ज्ञात आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांवरुन शेतमाल नेताना त्यांना कुठलाही नियम आडवा येत नाही. आता मात्र खासगी यंत्रणा तपासणी करणार असल्याने अनेकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी या सीमा तपासणी केंद्राला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. लगतच्या गुजरातमध्ये सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला असतांना राज्यात विसंगत निर्णय घेणे चुकीचे आहे. केळी नाशवंत फळ असल्याने शेतातून कापून आल्यानंतर वाहतूकीचे साधन ओव्हरलोड जरी झाले तरी अपवादात्मक परिस्थितीत शेतकर्‍यांच्या केळीमालाची नासाडी होवू नये, म्हणून तो भरून पाठवावाच लागतो. त्यामुळे ओव्हरलोडच्या नावाखाली वाहतूकदारांना वेठीस धरल्यास केळीच्या अच्छे दिनांमध्ये पुन्हा खोडा निर्माण होवू शकतो.भागवत पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ, रावेर

केंद्र व राज्य सरकारच्या या दुटप्पी धोरणात जर केळी उत्पादक असो की कापूस उत्पादक असो शेतमालाचे वाहनाची अडवणूक करून कथित दंडाच्या नावाखाली कोणीही ठेकेदार पैसे उकळण्याचा गोरखधंदा मांडत असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. शासनाने शेतमालाला त्यात सवलत द्यावी.अन्यथा वसूलीचा हा गोरखधंदा  हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.रमेश पाटीलअध्यक्ष, श्रमसाधना फार्मर प्रोड्युसर कंपनी, रावेर

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी