शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
4
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
5
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
6
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
8
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
9
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
10
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
11
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
12
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
13
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
14
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
15
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
16
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
17
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
18
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
19
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
20
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न

आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:02 AM

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देबैलजोड्यांची विक्री करतांना शेतकºयांच्या जिवाची झाली घालमेलअनेक शेतकरी पशुधन विकण्याच्या मनस्थितीत

आडगाव ता.चाळीसगाव : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरूवातीपासूनच दगा दिल्याने परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:च्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पशुंना जगवायचे कसे याचा पेच पडला आहे. त्यामुळे गुरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून आडगाव येथील शेतकºयांनी एकाच दिवशी तब्बल दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. अजून काही शेतकरी बैल जोडी व इतर गुरे विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. जिवाच्या मैतराला विकतांना शेतकºयांच्या जीवाचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते.आडगांवसह संपूर्ण मन्याड परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गडद होत चालल्याने पिके तर वाया गेलीच आहेत, आता तर मुक्या जनावरांना जगवायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. आडगांवसह परीसरातील बहुतेक गावांतील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बैलजोडी, शेळ्या पाळतो. शेतात मुबलक पाणी व चारा उपलब्ध राहत असल्याने गुरे पाळणे सोयीस्कर होते. परंतु गेल्या दोन/तीन वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गहन होत गेला आहे. थोड्या फार पाण्यावर चारा वगैरे टाकून आतापर्यंत शेतकºयांनी काटकसरीने पूरविले. या वर्षी खरीपात टाकलेला चारा व गवत पाण्याअभावी जळून गेल्याने या शिवाय परीसरात हीच परिस्थिती राहील्याने आतापासूनच चारा कुठून विकत आणावा ? महागडा चारा किती गुरांना पूरवावा, याचा ताळमेळ बसत नसल्याने मोठ्या हताश मनाने शेतकºयांनी मुक्या जनावरांना पाणी व चाºयाअभावी अर्धपोटी राहू देण्यापेक्षा त्यांना विकलेले बरे असा निर्णय घेत एकाच दिवशी दहा बैलजोड्या विकल्या. अजूनही काही शेतकरी पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण साखर कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत चारा पाणीसाठी मुकादमाच्या हवाली करणार आहेत. वर्षभर शेतात राबणाºया सर्जा- राजाला विकतांना किंवा साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्यासाठी मुकादमाच्या हवाली करतांना शेतकºयाच्या जिवाची घालमेल होत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ