शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:33 IST

सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र बदलणारा नेते आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, कोणी पहिलवान बाकी नाही. पण शरद पवारांनी एका रात्रीत चित्र बदललं, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे. 

मला स्वप्नांतही वाटत नव्हतं की, हे तीन पक्ष एकत्र येतील. पण त्यांनी करून दाखवलं, असंही एकनाथ खडसे म्हणाले. शरद पवार हे कार्यकर्त्यांना मोठे करणारे, त्यांच्याशी जवळीकता जोपासणारे नेते आहेत. गेल्या अर्धशतकातील राजकारणावर त्यांचा ठसा असून राजकारणाची दिशा बदलण्याचे काम त्यांनी केलं आहे, असं कौतुक एकनाथ खडसे यांनी केलं आहे. 

काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. 'हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे' असं एकनाथ खडसे म्हणाले. सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असंही एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. 

स्वतंत्रसेनानी आणि  माजी आमदार स्व. मुरलीधर अण्णा पवार यांच्या धरणगाव तालुक्यातील चांडसर येथील पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण झालं. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 

गृहमंत्रीसाहेब जरा कडक भूमिका घ्या- खडसे

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जरा कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवण्याचे आवाहन देखील एकनाथ खडसे यांनी केले आहे. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस