शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

अमृत अंतर्गत ३५ हजार घरांना दिले नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाकडून नवीन नळकनेक्शन देण्याचा कामालादेखील सुरुवात झाली आहे. आतापर्यंत शहरात ३५ हजार घरांना नळकनेक्शन देण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुशील साळुंखे यांनी दिली. येत्या तीन महिन्यात शहरातील अन्य भागातदेखील कनेक्शन देण्याचे काम पूर्ण होणार असल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले आहे.

अमृत योजनेनुसार शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळू शकणार आहे. तसेच ज्या भागात मनपा अंतर्गत पाणी पुरवठा होत नव्हता त्या भागातदेखील मनपाकडून आता पाणी पुरवठा केला जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या भागात मनपा पाणी पुरवठा विभागाकडून वर्षभराआधीच नळ कनेक्शन देण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली होती. जेणेकरून योजना पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना लगेच नवीन योजनेनुसार पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

लॉसेस टाळण्यासाठी कमी कनेक्शवर भर

शहरातील अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा मुद्दा काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. मात्र, नवीन अपार्टमेंटच्या ठिकाणी सम तयार असताना त्या ठिकाणी प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र कनेक्शन दिल्यास पाण्याचे मोठ्या प्रमाणात लॉसेस होऊ शकतात. त्यामुळे पाण्याची नासाडीदेखील होईल. तसेच जे अपार्टमेंट जुने आहेत तसेच त्या ठिकाणी नवीन टाकी किंवा सम करणे शक्य नसेल अशा ठिकाणच्या रहिवाशांना स्वतंत्र कनेक्शन देण्याचा विचार मनपाचा सुरू असला तरी ही संख्यादेखील कमी कशी होईल, यावरदेखील मनपाचा विचार सुरू आहे.

नवीन अपार्टमेंटमध्ये दोन कनेक्शन

गेल्या १० ते १५ वर्षात बांधण्यात आलेले अपार्टमेंट हे बहुमजली आहेत. त्यात ८ ते १० पेक्षा जास्त फ्लॅट बांधण्यात आले आहेत. तसेच अपार्टमेंटच्या जागेतच हजारो लीटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी तयार केलेली आहे. त्यामुळे २००८ च्या नियमानुसार भूमिगत टाकीत पाण्याचा साठा करण्याचा नियम लागू होत असून, अशा अपार्टमेंटमध्ये फ्लॅटच्या संख्येनुसार एक इंची व पाऊण इंची नळ कनेक्शन दिले जात आहे. भूमिगत टाकीतून फ्लॅटधारक गरजेनुसार पाण्याची उचल करू शकणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता सुशील साळुंखे यांनी सांगितले.

सर्वांना मिळणार नळकनेक्शन

शहरात अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. अनेक भागात नळकनेक्शन देण्याचे काम सुरू झाले आहे. आता नळ कनेक्शन देताना, ज्यांनी आधी कनेक्शन घेतले नव्हते अशांनादेखील मनपाकडून नळ कनेक्शन दिले जात आहे. जे अनधिकृत नळधारक आहेत त्यांना नळ कनेक्शन दिले तर मनपा प्रशासनाला पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्नदेखील मिळणार आहे. कारण शहरात तब्बल २० हजारहून अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. तसेच हुडकोसारख्या भागातदेखील नळ कनेक्शन देऊन, पाणी पट्टी आता वसूल करण्यात येणार असल्याचे धोरण मनपाकडून निश्चित केले जात आहे.