शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यांचा ‘गोडवा’ यंदा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:15 IST

दर घसरले : निर्यात बंद असल्याने हापूस पोहचला ग्रामीण भागातही

मतीन शेख।मुक्ताईनगर : खान्देशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवसापासून आंबे खायला सुरवात होते. एरव्ही १२ ही महिने आंबे उपलब्ध असलेल्या महानगरात तील आंब्यांचा गोडवा देखील आखाजी पासूनच लाभतो. यंदाच्या अक्षयतृतीय् ला लॉक डाउनमुळे गावरान आंब्यांच्या पाठोपाठ निर्यात बंदीमूळे देवगडचा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात गोडवा देणार हे विशेष. कोरोना संकट लॉक डाउन, आणि मागणी अभावी यंदा आंब्याचे दर ३० ते ४० टक्के उतरले आहे.खान्देशाच्या मातीचा सुगंध काही औरच असून येथील परंपरा, चालीरीती सण उत्सव निसर्गाच्या सानिध्याशी जुळलेले ऋतुमानानुसार आहार विहार आणि फळांचे सेवन ही परंपरा जोपासली जाते. त्या मागील शास्त्रीय पूरक आणि तर्क शुद्ध कारणेही दिली जातात. ऋतुमानानुसार फळांचा आहार हा शारीरिक गरजेला पूरक गणला जातो. त्या मूळे फळांचा गोडवा खऱ्या अथार्ने त्या त्या ऋतुमानावर अधिक असतो. यामुळेच खान्देशात आखजीला आंबे खायला ख?्या अथार्ने सुरवात होते याच काळात खान्देशी गावरान आंबे बहरतात, तर आंबे बाजारात दक्षिणेतून बदाम, लालपटा, आणि साऊथ केशर अक्षय तृतीया पूर्वी बाजारात दाखल झाले आहेत पाठोपाठ गुजराती केसर, दसेरी लंगडा या आंब्याचे आगमन प्रतीक्षेत आहे.हापूसही आवाक्यातआंब्यांचा राजा हापूस यंदा सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. कोरोना मुळे निर्यात बंदी असल्याने आताच बाजारात रत्नागिरी हापूस पाठोपाठ देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. इतवेळी डझन आणि पेटीने विकल्या जाणाºया हापूसचे दर निर्यातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर असतात. त्यात निर्यात दर्जाचे हापूस आंबे हे ग्रामीण वजा शहरी अशा भागात पाहायलाही मिळत नव्हते, यंदा मात्र आता पासून घरपोहोच उपलब्ध करून दिले जात आहे. आणि दरात आता पासून घसरण दिसून येत आहे.दर ४० टक्के घसरलेकोरोना संक्रमण लॉककडाउनमुळे आंब्यांची आवक कमी आहे. त्याच बरोबर मागणी सुद्धा कमी आहे. आंबे बाजारात यंदा आंब्याचे दर सरारसरी ३० ते ४० टक्क्याने घसरलेले दिसून येत आहे. गेल्या वर्षी आखाजीच्या आठवडाभर अगोदर किरकोळ बाजारात बदाम ,लालपटा,साऊथ केशर या आंब्याचे दर १०० ते १२० दरम्यान होते यंदा हे दर ७० ते ८० रुपये दरम्यान आहे. पाठोपाठ घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० टक्के पर्यंत खाली आले आहे. असे असून ही अद्याप हवी तशी मागणी नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहे तर शेतकरी मालाला भाव नसल्याने हवालदिल झाला आहे.