शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यांचा ‘गोडवा’ यंदा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:15 IST

दर घसरले : निर्यात बंद असल्याने हापूस पोहचला ग्रामीण भागातही

मतीन शेख।मुक्ताईनगर : खान्देशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवसापासून आंबे खायला सुरवात होते. एरव्ही १२ ही महिने आंबे उपलब्ध असलेल्या महानगरात तील आंब्यांचा गोडवा देखील आखाजी पासूनच लाभतो. यंदाच्या अक्षयतृतीय् ला लॉक डाउनमुळे गावरान आंब्यांच्या पाठोपाठ निर्यात बंदीमूळे देवगडचा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात गोडवा देणार हे विशेष. कोरोना संकट लॉक डाउन, आणि मागणी अभावी यंदा आंब्याचे दर ३० ते ४० टक्के उतरले आहे.खान्देशाच्या मातीचा सुगंध काही औरच असून येथील परंपरा, चालीरीती सण उत्सव निसर्गाच्या सानिध्याशी जुळलेले ऋतुमानानुसार आहार विहार आणि फळांचे सेवन ही परंपरा जोपासली जाते. त्या मागील शास्त्रीय पूरक आणि तर्क शुद्ध कारणेही दिली जातात. ऋतुमानानुसार फळांचा आहार हा शारीरिक गरजेला पूरक गणला जातो. त्या मूळे फळांचा गोडवा खऱ्या अथार्ने त्या त्या ऋतुमानावर अधिक असतो. यामुळेच खान्देशात आखजीला आंबे खायला ख?्या अथार्ने सुरवात होते याच काळात खान्देशी गावरान आंबे बहरतात, तर आंबे बाजारात दक्षिणेतून बदाम, लालपटा, आणि साऊथ केशर अक्षय तृतीया पूर्वी बाजारात दाखल झाले आहेत पाठोपाठ गुजराती केसर, दसेरी लंगडा या आंब्याचे आगमन प्रतीक्षेत आहे.हापूसही आवाक्यातआंब्यांचा राजा हापूस यंदा सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. कोरोना मुळे निर्यात बंदी असल्याने आताच बाजारात रत्नागिरी हापूस पाठोपाठ देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. इतवेळी डझन आणि पेटीने विकल्या जाणाºया हापूसचे दर निर्यातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर असतात. त्यात निर्यात दर्जाचे हापूस आंबे हे ग्रामीण वजा शहरी अशा भागात पाहायलाही मिळत नव्हते, यंदा मात्र आता पासून घरपोहोच उपलब्ध करून दिले जात आहे. आणि दरात आता पासून घसरण दिसून येत आहे.दर ४० टक्के घसरलेकोरोना संक्रमण लॉककडाउनमुळे आंब्यांची आवक कमी आहे. त्याच बरोबर मागणी सुद्धा कमी आहे. आंबे बाजारात यंदा आंब्याचे दर सरारसरी ३० ते ४० टक्क्याने घसरलेले दिसून येत आहे. गेल्या वर्षी आखाजीच्या आठवडाभर अगोदर किरकोळ बाजारात बदाम ,लालपटा,साऊथ केशर या आंब्याचे दर १०० ते १२० दरम्यान होते यंदा हे दर ७० ते ८० रुपये दरम्यान आहे. पाठोपाठ घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० टक्के पर्यंत खाली आले आहे. असे असून ही अद्याप हवी तशी मागणी नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहे तर शेतकरी मालाला भाव नसल्याने हवालदिल झाला आहे.