शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आंब्यांचा ‘गोडवा’ यंदा वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:15 IST

दर घसरले : निर्यात बंद असल्याने हापूस पोहचला ग्रामीण भागातही

मतीन शेख।मुक्ताईनगर : खान्देशात आखाजी हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. या दिवसापासून आंबे खायला सुरवात होते. एरव्ही १२ ही महिने आंबे उपलब्ध असलेल्या महानगरात तील आंब्यांचा गोडवा देखील आखाजी पासूनच लाभतो. यंदाच्या अक्षयतृतीय् ला लॉक डाउनमुळे गावरान आंब्यांच्या पाठोपाठ निर्यात बंदीमूळे देवगडचा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात गोडवा देणार हे विशेष. कोरोना संकट लॉक डाउन, आणि मागणी अभावी यंदा आंब्याचे दर ३० ते ४० टक्के उतरले आहे.खान्देशाच्या मातीचा सुगंध काही औरच असून येथील परंपरा, चालीरीती सण उत्सव निसर्गाच्या सानिध्याशी जुळलेले ऋतुमानानुसार आहार विहार आणि फळांचे सेवन ही परंपरा जोपासली जाते. त्या मागील शास्त्रीय पूरक आणि तर्क शुद्ध कारणेही दिली जातात. ऋतुमानानुसार फळांचा आहार हा शारीरिक गरजेला पूरक गणला जातो. त्या मूळे फळांचा गोडवा खऱ्या अथार्ने त्या त्या ऋतुमानावर अधिक असतो. यामुळेच खान्देशात आखजीला आंबे खायला ख?्या अथार्ने सुरवात होते याच काळात खान्देशी गावरान आंबे बहरतात, तर आंबे बाजारात दक्षिणेतून बदाम, लालपटा, आणि साऊथ केशर अक्षय तृतीया पूर्वी बाजारात दाखल झाले आहेत पाठोपाठ गुजराती केसर, दसेरी लंगडा या आंब्याचे आगमन प्रतीक्षेत आहे.हापूसही आवाक्यातआंब्यांचा राजा हापूस यंदा सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. कोरोना मुळे निर्यात बंदी असल्याने आताच बाजारात रत्नागिरी हापूस पाठोपाठ देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. इतवेळी डझन आणि पेटीने विकल्या जाणाºया हापूसचे दर निर्यातीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर असतात. त्यात निर्यात दर्जाचे हापूस आंबे हे ग्रामीण वजा शहरी अशा भागात पाहायलाही मिळत नव्हते, यंदा मात्र आता पासून घरपोहोच उपलब्ध करून दिले जात आहे. आणि दरात आता पासून घसरण दिसून येत आहे.दर ४० टक्के घसरलेकोरोना संक्रमण लॉककडाउनमुळे आंब्यांची आवक कमी आहे. त्याच बरोबर मागणी सुद्धा कमी आहे. आंबे बाजारात यंदा आंब्याचे दर सरारसरी ३० ते ४० टक्क्याने घसरलेले दिसून येत आहे. गेल्या वर्षी आखाजीच्या आठवडाभर अगोदर किरकोळ बाजारात बदाम ,लालपटा,साऊथ केशर या आंब्याचे दर १०० ते १२० दरम्यान होते यंदा हे दर ७० ते ८० रुपये दरम्यान आहे. पाठोपाठ घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० टक्के पर्यंत खाली आले आहे. असे असून ही अद्याप हवी तशी मागणी नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहे तर शेतकरी मालाला भाव नसल्याने हवालदिल झाला आहे.