शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

चाळीसगावात 60 धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले, पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 23:16 IST

पावसाळा सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण, पडावू व धोकादायक ६० इमारतींचे सर्वेक्षण केले आहे.

ठळक मुद्देनोटिसा देण्याबाबत पालिकेकडून विलंब, सुरक्षेचा प्रश्न निर्माण

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : पावसाळा सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण, पडावू व धोकादायक ६० इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. मात्र पावसाळा तोंडावर येऊनही संबंधित घरमालक, भाडेकरूंना अद्याप नोटिसा बजावल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

पावसाळ्यात विशेषतः संततधार पावसात कच्ची,जुनाट व जीर्ण झालेल्या इमारती पडण्याची भीती असते. अशामुळे नाहक काही जणांना अपघातालाही सामोरे जावे लागते. या इमारती ढासळल्यास जीवित व वित्तहानीही होऊ शकते. याचा धोका ओळखून पालिकेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

दरम्यान, शहरातील धोकादायक इमारतीचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात आले असून त्याबाबतच्या नोटिसा तयार आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे नोटिसा बजावल्या गेल्या नाहीत. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

चोपड्यात नदीकाठावरील १०० जणांना नोटिसा 

चोपडा : चोपडा नगरपालिकेने दोन भिंत आणि एक इमारत पाडण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.  दोन जण बाहेर गावी  असल्याने नोटिस देण्यात अडचणी येत आहे. शहरात एक जण स्थायिक असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. परंतु दोन जण मालक  बाहेरगावी आहे.  त्यांचा पूर्ण पत्ता मिळत नसल्याने दोन जणांना नोटीस देरण्यात अडचण आली आहे.  तसेच नदीकाठावरील अतिक्रमणधारक नागरिकांना नोटीस बजावून व्यवस्था करून घ्यावी असे जवळपास शंभरच्यावर नागरिकांना नोटीसद्वारे  कळविण्यात आले आहे.अशी माहिती बांधकाम विभागातील राजेंद्र बाविस्कर यांनी दिली. 

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाChalisgaonचाळीसगावMuncipal Corporationनगर पालिका