शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:47 IST

जळगाव - सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ...

जळगाव- सकाळी घराबाहेर निघालेल्या महिलेने आशाबाबानगर परिसरातील रेल्वेपुलावर धावत्या रेल्वेसमोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ धनश्री पंकज वसाने (२६, रा़ आशाबाबानगर) असे मयत महिलेचे नाव आहे़ दरम्यान, महिलेचा मृतदेह हा चार तास जागेवरच पडून होता़ मुलीचा शोध घेत असताना पुलावर काय गर्दी आहे, हे पाहण्यासाठी गेलेल्या वडीलांना मुलीचाच मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला़आशाबाबा नगरात श्रीराम राजाराम चौधरी हे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ ते विद्यापीठातील कर्मचारी आहेत़ दरम्यान, त्यांची मुलगी धनश्री हिचे पंकज वसाने यांच्याशी लग्न झाले होते़ परंतू, काही वर्षानंतर पंकज यांचे निधन झाल्यामुळे धनश्री या वडीलांकडे आशाबाबानगरात राहत होत्या़ मात्र, काही महिन्यांपासून त्या मानसिक आजारात होत्या़ मंगळवारी सकाळी श्रीराम चौधरी हे ड्युटीसाठी निघून गेले तर त्यांच्या पत्नी सुध्दा बाहेर गेल्या होत्या़ त्याचदरम्यान, धनश्री या घराबाहेर निघाल्या़ काहीवेळानंतर आशाबाबानगर रेल्वे पुलावर त्यांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली़नागरिकांना हटकले़़़दरम्यान, धनश्री वसाने या रेल्वे रूळाजवळ फिरत असताना नागरिकांना ते हटकले होते़ त्यामुळे त्या काही अंतर आणखी पुढे चालत गेल्या़ त्यानंतर घटना घडली़ डोक्याला व शरिराला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला़ कुणीतरी आत्महत्या केल्यामुळे नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली़ त्यामुळे बघ्यांची गर्दी झालेली होती़आणि मुलगी दिसली मृतावस्थेतमुलगी धनश्री ही कुठतरी निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर वडील श्रीराम हे दुपारपासून तिचा शोध घेत होते़ अखेर सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना आशाबाबानगर पुलाजवळ काही तरी घटना घडली अशी माहिती मिळाली़ त्यांनी त्वरित त्याठिकाणी धाव घेतली़ अन् त्यांना रेल्वेच्या धक्कयामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे दिसले़ जागेवरच हंबरडा फोडत काहीवेळानंतर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली़चार तास मृतदेह पडूनदुपारी साडे बारा ते एक वाजेच्या सुमारास घटना घडल्यानंतर लोहमार्ग व रामानंदनगर पोलिसांना माहिती न मिळाल्यामुळे तब्बल ४ चार मृतदेह जागेवर पडून होता़ अखेर सायंकाळी मयत महिलेच्या वडीलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेले़यापूर्वीही त्या निघाल्या होत्या घरूनधनश्री ह्याआॅगस्ट महिन्यात सुध्दा घरातून बाहेर निघून गेल्या होत्या़ त्याबाबत वडील श्रीराम चौधरी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली होती़ मात्र, दोन दिवसानंतर त्या पुन्हा घरी परतल्यानंतर चौधरी यांना त्यासंदर्भांत पोलिसांना कळविले होते, अशी माहिती मयत महिलेच्या वडीलांनी दिली़

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव