शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रावळगाव साखर कारखान्याकडील उसाचे थकीत पेमेंट लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 16:45 IST

रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याकडून ऊसाचे पेमेंट थकल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील उत्पादकांना दिलासाअलिबाग येथे आ. चव्हाण यांनी घेतली शेतकऱ्यांसह भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला. याच उसाचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट थकल्याने शेतकरी हतबल झाले होते. बुधवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिबाग येथे कारखान्याचे मालक आमदारजयंत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. उसाचे पेमेंट न मिळाल्यास टोकाचा निर्णय घेऊ, अशी भूमिका या भेटीत आ. चव्हाण यांनी मांडल्यानंतर येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे थकलेले पेमेंट देण्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुका परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

रावळगावच्या साखर कारखान्याच्या २०२०-२०२१च्या गळीत हंगामासाठी तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात दिला. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकऱ्यांचे १५ कोटीहून अधिक रकमेचे पेमेंट थकीत होते. यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक आणि कारखान्याच्या प्रशासनाकडे पेमेंटची मागणी केली. मात्र पेमेंट मिळाले नाही. प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले होते. पेमेंट थकल्याने खरीप हंगामासाठीही अडचण निर्माण झाल्या होत्या.

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

उसाचे पेमेंट मिळत नसल्याने हतबल झालेल्या ऊस शेतकऱ्यांनी आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. चव्हाण यांनी आमदार जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे, पेमेंटसाठी होणारी दिरंगाई याबाब चर्चा केली. यानंतरही पेमेंट मिळत नसल्याने शेवटी बुधवारी शेतकऱ्यांसह आ. चव्हाण यांनी कारखान्याचे मालक आ. जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी धडक दिली. पेमेंट मागणीचे निवेदनही दिले. चव्हाण यांच्यासोबत शेषराव पाटील, उद्धवराव माळी, भाजयुमोर्चाचे कपिल पाटील, रोहन सूर्यवशी, राम पाटील हेही उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आ. जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्य:स्थिती अवगत केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उसाचे एकूण प्रलंबित पेमेंट व १८ टक्के व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे उसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. हे पेमेंट तातडीने द्या, अशी मागणीही केली. यावर जयंत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून येत्या १५ दिवसात थकीत पेमेंट देण्याचे आश्वासित केले.

यावर्षी मी ३५० टन ऊस कोदगाव व परिसरातून रावळगाव कारखान्याला दिला. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनीही ऊस दिला आहे. तथापि पाच महिने उलटूनही उसाचे पेमेंट मिळाले नाही. आमची व्यथा समजून घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घातले. अलिबाग येथे आमच्यासोबत येऊन कारखाना मालकाची भेट दिली. यामुळे पेमेंट मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

शेषराव पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, कोदगाव, ता. चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावJayant Patilजयंत पाटीलMLAआमदार