शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रावळगाव साखर कारखान्याकडील उसाचे थकीत पेमेंट लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 16:45 IST

रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याकडून ऊसाचे पेमेंट थकल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील उत्पादकांना दिलासाअलिबाग येथे आ. चव्हाण यांनी घेतली शेतकऱ्यांसह भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला. याच उसाचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट थकल्याने शेतकरी हतबल झाले होते. बुधवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिबाग येथे कारखान्याचे मालक आमदारजयंत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. उसाचे पेमेंट न मिळाल्यास टोकाचा निर्णय घेऊ, अशी भूमिका या भेटीत आ. चव्हाण यांनी मांडल्यानंतर येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे थकलेले पेमेंट देण्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुका परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

रावळगावच्या साखर कारखान्याच्या २०२०-२०२१च्या गळीत हंगामासाठी तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात दिला. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकऱ्यांचे १५ कोटीहून अधिक रकमेचे पेमेंट थकीत होते. यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक आणि कारखान्याच्या प्रशासनाकडे पेमेंटची मागणी केली. मात्र पेमेंट मिळाले नाही. प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले होते. पेमेंट थकल्याने खरीप हंगामासाठीही अडचण निर्माण झाल्या होत्या.

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

उसाचे पेमेंट मिळत नसल्याने हतबल झालेल्या ऊस शेतकऱ्यांनी आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. चव्हाण यांनी आमदार जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे, पेमेंटसाठी होणारी दिरंगाई याबाब चर्चा केली. यानंतरही पेमेंट मिळत नसल्याने शेवटी बुधवारी शेतकऱ्यांसह आ. चव्हाण यांनी कारखान्याचे मालक आ. जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी धडक दिली. पेमेंट मागणीचे निवेदनही दिले. चव्हाण यांच्यासोबत शेषराव पाटील, उद्धवराव माळी, भाजयुमोर्चाचे कपिल पाटील, रोहन सूर्यवशी, राम पाटील हेही उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आ. जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्य:स्थिती अवगत केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उसाचे एकूण प्रलंबित पेमेंट व १८ टक्के व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे उसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. हे पेमेंट तातडीने द्या, अशी मागणीही केली. यावर जयंत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून येत्या १५ दिवसात थकीत पेमेंट देण्याचे आश्वासित केले.

यावर्षी मी ३५० टन ऊस कोदगाव व परिसरातून रावळगाव कारखान्याला दिला. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनीही ऊस दिला आहे. तथापि पाच महिने उलटूनही उसाचे पेमेंट मिळाले नाही. आमची व्यथा समजून घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घातले. अलिबाग येथे आमच्यासोबत येऊन कारखाना मालकाची भेट दिली. यामुळे पेमेंट मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

शेषराव पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, कोदगाव, ता. चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावJayant Patilजयंत पाटीलMLAआमदार