शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रावळगाव साखर कारखान्याकडील उसाचे थकीत पेमेंट लवकरच मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 16:45 IST

रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याकडून ऊसाचे पेमेंट थकल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखान्याचे मालक आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली.

ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील उत्पादकांना दिलासाअलिबाग येथे आ. चव्हाण यांनी घेतली शेतकऱ्यांसह भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : रावळगाव येथील एस.जे. शुगर यासाखर कारखान्याच्या या वर्षाच्या गळीत हंगामासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस दिला. याच उसाचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट थकल्याने शेतकरी हतबल झाले होते. बुधवारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अलिबाग येथे कारखान्याचे मालक आमदारजयंत पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. उसाचे पेमेंट न मिळाल्यास टोकाचा निर्णय घेऊ, अशी भूमिका या भेटीत आ. चव्हाण यांनी मांडल्यानंतर येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांचे थकलेले पेमेंट देण्याचे आमदार पाटील यांनी मान्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुका परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

रावळगावच्या साखर कारखान्याच्या २०२०-२०२१च्या गळीत हंगामासाठी तालुका व परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस मोठ्या प्रमाणात दिला. मात्र गेल्या ५ महिन्यांपासून या शेकडो शेतकऱ्यांचे १५ कोटीहून अधिक रकमेचे पेमेंट थकीत होते. यासाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक आणि कारखान्याच्या प्रशासनाकडे पेमेंटची मागणी केली. मात्र पेमेंट मिळाले नाही. प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत होती. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले होते. पेमेंट थकल्याने खरीप हंगामासाठीही अडचण निर्माण झाल्या होत्या.

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

उसाचे पेमेंट मिळत नसल्याने हतबल झालेल्या ऊस शेतकऱ्यांनी आ. मंगेश चव्हाण यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. चव्हाण यांनी आमदार जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे, पेमेंटसाठी होणारी दिरंगाई याबाब चर्चा केली. यानंतरही पेमेंट मिळत नसल्याने शेवटी बुधवारी शेतकऱ्यांसह आ. चव्हाण यांनी कारखान्याचे मालक आ. जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी धडक दिली. पेमेंट मागणीचे निवेदनही दिले. चव्हाण यांच्यासोबत शेषराव पाटील, उद्धवराव माळी, भाजयुमोर्चाचे कपिल पाटील, रोहन सूर्यवशी, राम पाटील हेही उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी आ. जयंत पाटील यांना चाळीसगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांची सद्य:स्थिती अवगत केली. त्यांनी सांगितले की, शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उसाचे एकूण प्रलंबित पेमेंट व १८ टक्के व्याज यानुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना तातडीने देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असतानाही आजतागायत रावळगाव कारखान्याने देयके अदा केलेले नाही. कोरोना व टाळेबंदीमुळे शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे उसाची थकबाकी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. हे पेमेंट तातडीने द्या, अशी मागणीही केली. यावर जयंत पाटील यांनी स्वतः लक्ष घालून येत्या १५ दिवसात थकीत पेमेंट देण्याचे आश्वासित केले.

यावर्षी मी ३५० टन ऊस कोदगाव व परिसरातून रावळगाव कारखान्याला दिला. तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनीही ऊस दिला आहे. तथापि पाच महिने उलटूनही उसाचे पेमेंट मिळाले नाही. आमची व्यथा समजून घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रश्नात लक्ष घातले. अलिबाग येथे आमच्यासोबत येऊन कारखाना मालकाची भेट दिली. यामुळे पेमेंट मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

शेषराव पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, कोदगाव, ता. चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावJayant Patilजयंत पाटीलMLAआमदार