शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वडजी येथे झोपडीला अचानक आग, संसार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 23:14 IST

भडगाव तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागली.

ठळक मुद्दे७० हजारांचे नुकसान, आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : तालुक्यातील वडजी येथील एका भिल्ल आदिवासी कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागून झोपडी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे या कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. तलाठी विलास शिंदे यांनी सुमारे ७० हजारांचे नुकसान पंचनाम्यात नमूद केल्याचे सांगितले. प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वडजी येथे भिल्ल वस्तीतील रहिवाशी मोहन भिल्ल याच्यां राहत्या झोपडीला अचानक आग लागली. त्यात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. यात सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी विलास शिंदे यांनी दिली. पती पत्नी दोघंही मजुरीसाठी बाहेर कामाला गेले होते. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण समजु शकले नाही. तलाठी विलास शिंदे यांनी घटस्थळी येऊन पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर केल्याचे सांगण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जिकरीने ही आग आटोक्यात आणली. यावेळी वडजी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पाटील, सुधाकर पाटील, स्वदेश पाटील यांनी भेटून मदत मिळवून देण्थासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सुधाकर पाटील यांनी तहसिलदार सागर ढवळे यांना यासंदर्भात माहीती देऊन तत्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मदत लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले तर महसुल विभागाकडून या कुटुंबाला किराणा उपलब्ध करू देऊ, असे सांगितल्याची माहिती सुधाकर पाटील यांनी दिली.

समोर आग अन् डोळ्यात अश्रू

अन्नधान्यासह कपडे, टीव्ही, भांडे आदी वस्तू जळाल्याने या कुटुंबाचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. जळालेला संसार पाहून सुनंदा भिल्ल यांच्या डोळ्यात अश्रूनी घर केले होते. समोर आगीत जळून गेलेला संसार आणि डोळ्यात अश्रू असे हृदयस्पर्शी चित्र यावेळी बघायला मिळाले.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावfireआग