शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर केली टीका

अमळनेर : राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असून या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढली आहे. निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्देशच केवळ मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.चोपडा येथून निर्धार परिवर्तन यात्रा आटोपून नाशिक परत जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असल्याचे सांगत या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढल्याचा आरोपही केला. या सरकारच्या काळात विचार स्वातंत्र्य नष्ट झाल्याचेही भुजबळ म्हणाले.आरक्षण हा ‘चुनावी जुमला’परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश याठिकाणी जशी हवा बदलली आहे तशीच हवा महाराष्ट्रात बदलली आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला आहे, लोक ‘अच्छे दिन’ची आता टिंगल उडवत आहेत. चार-पाच राज्यात पराभव झाल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमिषे दाखवायला त्यांनी सुरुवात केल्याचे सांगत, आरक्षण हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणला पहिल्यापासून पाठिंबा देत होतो इतकेच नाही तर संसदेची मंजुरी मिळवून आणा याचा फायदा पाटीदार, पटेल, जाट यासारख्या देशभर पसरलेल्या समाजालादेखील होईल व त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. आरक्षण हा मुद्दा केवळ निवडणूक डोळ््यापुढे ठेऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.विकासाचे काहीच बोलत नाहीआरक्षण ५० टक्यांच्यावर दिले जाऊ नये, असे २०१४ मध्ये सांगणारे आता आरक्षण देत असल्याचेही भुजबळ म्हणाले. गेल्या वेळी मी गुजरातचा विकास केला आहे, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा, असे सांगणारे मोदी आता विकासाचे काही बोलत नाही, आता तेही लढाई जनता विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगतात. म्हणजे यातून मोदीही गेले आणि विकासही गेला. आता त्यांनी जनतेला यात ओढले असल्याची टीका त्यांनी केली.पत्रकारांच्या लेखणीवर बंधनमहागाई, पेट्रोल या सारखी चुनावी जुमला सांगून मतदान घेतले, आता देशात मुस्लीम, दलितांवर अन्याय केला जात आहे, विकासाचा कुठेच पत्ता नाही. भ्रष्टाचाराचे अवडंबर केले होते, राफेल साडे पाचशे कोटीचे साडे सोळाशे कोटी का दिले आणि अंबानींनी काय दिले याचे उत्तर अजून दिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली, पत्रकारांनी काय लिहावे यावर बंधन आहे. मोठ्या पत्रकारांचे काय झाले, नयनतारा सहगल यांना अडविले, कारण ही मंडळी भाजपवर टीका करणारी होती, अशा विविध मुद्यांवर भुजबळ यांनी टीका.

टॅग्स :Jalgaonजळगाव