शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर केली टीका

अमळनेर : राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असून या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढली आहे. निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्देशच केवळ मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.चोपडा येथून निर्धार परिवर्तन यात्रा आटोपून नाशिक परत जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असल्याचे सांगत या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढल्याचा आरोपही केला. या सरकारच्या काळात विचार स्वातंत्र्य नष्ट झाल्याचेही भुजबळ म्हणाले.आरक्षण हा ‘चुनावी जुमला’परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश याठिकाणी जशी हवा बदलली आहे तशीच हवा महाराष्ट्रात बदलली आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला आहे, लोक ‘अच्छे दिन’ची आता टिंगल उडवत आहेत. चार-पाच राज्यात पराभव झाल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमिषे दाखवायला त्यांनी सुरुवात केल्याचे सांगत, आरक्षण हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणला पहिल्यापासून पाठिंबा देत होतो इतकेच नाही तर संसदेची मंजुरी मिळवून आणा याचा फायदा पाटीदार, पटेल, जाट यासारख्या देशभर पसरलेल्या समाजालादेखील होईल व त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. आरक्षण हा मुद्दा केवळ निवडणूक डोळ््यापुढे ठेऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.विकासाचे काहीच बोलत नाहीआरक्षण ५० टक्यांच्यावर दिले जाऊ नये, असे २०१४ मध्ये सांगणारे आता आरक्षण देत असल्याचेही भुजबळ म्हणाले. गेल्या वेळी मी गुजरातचा विकास केला आहे, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा, असे सांगणारे मोदी आता विकासाचे काही बोलत नाही, आता तेही लढाई जनता विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगतात. म्हणजे यातून मोदीही गेले आणि विकासही गेला. आता त्यांनी जनतेला यात ओढले असल्याची टीका त्यांनी केली.पत्रकारांच्या लेखणीवर बंधनमहागाई, पेट्रोल या सारखी चुनावी जुमला सांगून मतदान घेतले, आता देशात मुस्लीम, दलितांवर अन्याय केला जात आहे, विकासाचा कुठेच पत्ता नाही. भ्रष्टाचाराचे अवडंबर केले होते, राफेल साडे पाचशे कोटीचे साडे सोळाशे कोटी का दिले आणि अंबानींनी काय दिले याचे उत्तर अजून दिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली, पत्रकारांनी काय लिहावे यावर बंधन आहे. मोठ्या पत्रकारांचे काय झाले, नयनतारा सहगल यांना अडविले, कारण ही मंडळी भाजपवर टीका करणारी होती, अशा विविध मुद्यांवर भुजबळ यांनी टीका.

टॅग्स :Jalgaonजळगाव