शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 23:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर केली टीका

अमळनेर : राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असून या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढली आहे. निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्देशच केवळ मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.चोपडा येथून निर्धार परिवर्तन यात्रा आटोपून नाशिक परत जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असल्याचे सांगत या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढल्याचा आरोपही केला. या सरकारच्या काळात विचार स्वातंत्र्य नष्ट झाल्याचेही भुजबळ म्हणाले.आरक्षण हा ‘चुनावी जुमला’परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश याठिकाणी जशी हवा बदलली आहे तशीच हवा महाराष्ट्रात बदलली आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला आहे, लोक ‘अच्छे दिन’ची आता टिंगल उडवत आहेत. चार-पाच राज्यात पराभव झाल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमिषे दाखवायला त्यांनी सुरुवात केल्याचे सांगत, आरक्षण हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणला पहिल्यापासून पाठिंबा देत होतो इतकेच नाही तर संसदेची मंजुरी मिळवून आणा याचा फायदा पाटीदार, पटेल, जाट यासारख्या देशभर पसरलेल्या समाजालादेखील होईल व त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. आरक्षण हा मुद्दा केवळ निवडणूक डोळ््यापुढे ठेऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.विकासाचे काहीच बोलत नाहीआरक्षण ५० टक्यांच्यावर दिले जाऊ नये, असे २०१४ मध्ये सांगणारे आता आरक्षण देत असल्याचेही भुजबळ म्हणाले. गेल्या वेळी मी गुजरातचा विकास केला आहे, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा, असे सांगणारे मोदी आता विकासाचे काही बोलत नाही, आता तेही लढाई जनता विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगतात. म्हणजे यातून मोदीही गेले आणि विकासही गेला. आता त्यांनी जनतेला यात ओढले असल्याची टीका त्यांनी केली.पत्रकारांच्या लेखणीवर बंधनमहागाई, पेट्रोल या सारखी चुनावी जुमला सांगून मतदान घेतले, आता देशात मुस्लीम, दलितांवर अन्याय केला जात आहे, विकासाचा कुठेच पत्ता नाही. भ्रष्टाचाराचे अवडंबर केले होते, राफेल साडे पाचशे कोटीचे साडे सोळाशे कोटी का दिले आणि अंबानींनी काय दिले याचे उत्तर अजून दिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली, पत्रकारांनी काय लिहावे यावर बंधन आहे. मोठ्या पत्रकारांचे काय झाले, नयनतारा सहगल यांना अडविले, कारण ही मंडळी भाजपवर टीका करणारी होती, अशा विविध मुद्यांवर भुजबळ यांनी टीका.

टॅग्स :Jalgaonजळगाव