शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

धरणगावात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 17:11 IST

धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देजनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

धरणगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी धरणगावात सुरु केलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद होती.

तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात एकमेव उपाय म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने जनता कर्फ्यू घोषित केला. शहरात गुरुवार म्हणजे बाजाराचा दिवस असतो आणि खूप मोठी गर्दी होत असते. म्हणून गुरुवारीच जनता कर्फ्यू लागू करायचा, असे ठरवण्यात आले. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी शहरवासीयांना कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यानुसार गुरुवारी जनता कर्फ्यूला व्यापारी वर्गासह नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत दिवसभर आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवले.

बाजारपेठेतील सर्व लहान-मोठे दुकानदार, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, गॅरेज, फळ विक्रेते तसेच छोटेमोठे सर्व व्यापारी यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल, दूध केंद्रे वगळली तर पूर्ण बाजारात शुकशुकाट होता. या पुकारलेल्या बंदचे अनेकांनी स्वागत केले असून कोरोना टाळण्यासाठी हा एकमेव पर्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई यावेळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केली.

दर गुरुवारी अशाच प्रकारचा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी जनार्दन पवार तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बंद पाळण्यासाठी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर, जयेश भावसार, योगेश तळेगाव, समसुद्दिन शेख, आण्णा महाजन, रामकृष्ण महाजन, विशाल पचेरवार, संदीप करोसिया, सिकंदर पवार, अनिल पाटील, सुरेश सोनवणे यांचे सहकार्य लाभले

कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वारंवार सांगूनदेखील नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या जनता कर्फ्यू ची अत्यंत आवश्यकता आहे. शहरात सगळ्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शासनास सहकार्य केलेले आहे.

मंगल बाळकृष्ण भाटिया,

अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, धरणगाव.

शहरात कोरोनाची दुसरी लाट येते, अशी भीती निर्माण झाली आहे. बाजारपेठेत गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व टाळण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे आवश्यक होते, यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळले पाहिजे.

निंबा जंगलू निकम,

नागरिक, धरणगाव

टॅग्स :JalgaonजळगावDharangaonधरणगावcorona virusकोरोना वायरस बातम्या