फडणवीस यांना बोदवडला दिले पाणी टंचाईबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:34+5:302021-06-02T04:14:34+5:30
फडणवीस मुख्यमंत्री असताना बोदवड तालुक्यासाठी पाणी पुरवठा योजनेकरिता ४२ कोटी रुपये निधी मंजूर केलेला असून, ते काम संथ ...

फडणवीस यांना बोदवडला दिले पाणी टंचाईबाबत निवेदन
फडणवीस मुख्यमंत्री असताना बोदवड तालुक्यासाठी पाणी पुरवठा योजनेकरिता ४२ कोटी रुपये निधी मंजूर केलेला असून, ते काम संथ गतीने काम सुरू आहे. संबंधित ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधी हे लक्ष घालत नाहीत. म्हणून योजनेचे काम अपूर्ण स्थितीत आहे, असा आरोप केला आहे.
आजही बोदवड शहर ओडीए पेयजल योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या ओंजळीचे पाणी पीत आहे, या कालबाह्य झालेल्या योजनेवर आजही ८१ गावांची तहान अवलंबून आहे. ही योजना कुचकामी ठरली असून, समस्या अधिकच वाढली आहे. बोदवड तालुक्यासाठी मंजूर योजना त्वरित कार्यान्वित व्हावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अनंता कुलकर्णी, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, उमेश गुरव, नरेश आहुजा, धनराज सुतार, रोहित अग्रवाल, नाडगावचे सुधीर पाटील, गणेश शर्मा, दिलीप घुले, राम आहुजा, पंकज चांदुरकर, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल, संतोष चौधरी, वैभव माटे, महेंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
010621\01jal_25_01062021_12.jpg
===Caption===
बोदवड येथे फडणवीस यांना निवेदन देताना.