शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाची सापत्न वागणूक

By admin | Updated: October 9, 2014 15:02 IST

राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत.

जळगाव : राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. परिणामी शासनस्तरावर जळगावचे प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी सक्षम नेताच नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. 

सुरेशदादांनी विकास केला
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आमदार सुरेशदादांनी दूरदृष्टी ठेवून वाघूर योजना केली नसती तर उन्हाळ्यात जळगावकरांना शहर सोडून जाण्याची वेळ आली असती. उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये १५-२0 दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना जळगावमध्ये मात्र दोन दिवसांआड पाणी मिळाले. दादांनी जळगावचा विकास केला. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाहिले तर इतका नियोजनबद्ध विकास झालेला दिसत नाही. 
..तर जळगावचे होईल सिंगापूर
मनपाला निधीचा प्रश्न आहे. जनतेवर भार पडू न देता विकास करण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना ओढून आणणे गरजेचे आहे. मात्र आमदार सुरेशदादांसारखेच सक्षम नेतृत्वाची अनुपस्थिती तिव्रतेने जाणवत आहे. रमेशदादा, नितीन लढ्ढा यांनी केंद्रशासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २२00 कोटींचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्याची मंजुरी रखडल्याने या योजनांचा खर्च आज सुमारे ५ हजार कोटींवर पोहोचला आहे. विमानतळ शोभेचे शहराचा विकास करावयाचा असेल तर दळणवळण सेवा सहज उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यातही विमानतळ असणे सर्वात महत्त्वाचे असते. ते असेल व त्यावर विमानसेवा सुरू असली तर मोठे उद्योग शहरात आणणे शक्य होईल, हे लक्षात घेऊनच आमदार सुरेशदादांनी मनपाच्या कर्तव्यात नसतानाही विमानतळ योजना हाती घेण्याची सूचना केली. नंतर शासनाने ही योजना परत मागितली तर त्यामार्गे लवकर पूर्ण व्हावी म्हणून ती शासनाला आडकाठी न आणता परतही केली. त्यामुळेच विमानतळाचे काम मार्गी लागले. मात्र ते या विमानतळाच्या उद््घाटन समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर तर अडीच वर्ष ते जळगावबाहेरच आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या अडीच वर्षात या विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा झाली नाही किंवा पाठपुरावा करणे जमले नाही.
-----------
आमदार सुरेशदादांच्या अनुपस्थितीत राज्य शासनाने मनपाला सापत्नपणाची वागणूक देत अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले. मात्र जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने याबाबत शासनाला जाब विचारला नाही. मार्केट कराराच्या विषयांना दरवेळी स्थगिती देत हुडको कर्जफेडीचा मार्ग बंद करण्यात आला. त्याबाबत जाब विचारण्यासाठीही आमदार सुरेशदादांची उणीव तिव्रतेने जाणवली. विरोधकांनी केवळ अडथळे आणण्याचे काम केले.