शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

‘कुलसचिव हटाव’साठी कर्मचाऱ्यांचा तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती गट समितीच्यावतीने प्रभारी कुलगुरूंच्या दालनासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनात विद्यापीठातील शेकडो अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग होता. दरम्यान, राजीनाम्यासंदर्भात एक ते दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन समितीला देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव भैय्यासाहेब पाटील यांनी दिली.

प्रभारी कुलसचिव एस. आर. भादलीकर यांनी शिक्षकतेर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता शिक्षण संचालक कार्यालयात पाठविली होती, असा आरोप करीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती गट समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आठ दिवसात राजीनामा नाही घेतला तर आंदोलन करण्‍यात येईल, असाही इशारा कृती समितीने दिला होता. त्यानंतर गुरुवारी कृती समितीने नाशिक गाठत प्रभारी कुलगुरू यांची भेट घेतली होती. त्यानंतर कुलगुरूंनी राजीनामा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पुढील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे सोमवार, २६ रोजी कृती समितीतर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेण्यात आली.

जोरदार घोषणाबाजी

द्वारसभा पार पडल्यानंतर कृती समितीच्यावतीने थेट प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांच्या दालनाबाहेर दुपारी २ वाजता ठिय्या आंदोलन करण्‍यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. यावेळी कृती समितीचा विजय असो, कुलसचिव यांना हटवा अशी जोरदार घोषणबाजी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ठिय्या आंदोलन विद्यापीठातील शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश होता. नंतर कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दालनात बोलवून घेऊन मागणी ऐकून घेतली. नंतर एक ते दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन समितीला देण्यात आले. हे आंदोलन समितीचे अध्‍यक्ष शरद पाटील, सचिव भैय्यासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, महेश पाटील, दुर्योधन साळुंखे यांच्या नेतृत्‍वाखाली करण्यात आले.