शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

भरकटलेली तरुणाई अन् चिंतीत पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 11:21 IST

मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाचा गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या आवारातच चॉपरने भोसकून खून झाला. या खूनातील मुख्य संशयित किरण हटकर व त्याचे पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. किरण हटकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांविरुध्द पोलिसात साधी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही.

ठळक मुद्दे विश्लेषण‘करतं कोण अन् भरतं कोण’ ‘चारित्र्य पडताळणी’ ला ब्रेक

सुनील पाटीलजळगाव : मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाचा गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या आवारातच चॉपरने भोसकून खून झाला. या खूनातील मुख्य संशयित किरण हटकर व त्याचे पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. किरण हटकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांविरुध्द पोलिसात साधी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही. त्यातील एक जण तर पोलीस कर्मचा-याचा मुलगा आहे. त्याला कायद्याची पूर्णपणे जाणीव आहे. किरण हटकर याला मुकेशची हत्या करायचीच नव्हती, त्याच्या निशाण्यावर दुसरा गुन्हेगार होता. असे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. रागाच्या भरात त्याच्याकडून खून झाला. मुकेशचा नसला तरी इतर कोणाचा तरी खून करण्याचा उद्देश होताच, हे त्यातून निष्पन्न होत आहे. त्याच्याजवळ असलेल्या चॉपरबाबत इतर त्याच्या मित्रांना माहिती होते की नाही हे त्यांनाच माहिती, मात्र घटनेच्या दिवशी किरणसोबत राहणे हेच या पाच तरुणांवर बेतलेले आहे. किरणच्या संगतीपासून लांब राहिले असते तर या पाच तरुणांवर खूनाचा व गुन्हेगारी डाग लागला नसता. या घटनेमुळे समाजात या तरुणांसह त्यांच्या पालकांची बदनामी झाली. ‘करतं कोण अन् भरतं कोण’ अशी स्थिती या प्रकरणात पाचही तरुण व त्यांच्या कुटुंबियांची झालेली आहे. प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जेमतेमच आहे. दोघांना तर वडील देखील नाही. त्यांच्या जन्मदातीवर काय प्रसंग बेतला असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी. पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्याने या सर्वांचे भवितव्य धोक्यातच आहे. सरकारी नोकरी असो कि इतर उद्योग, व्यवसाय करायचा असला तर त्यांन्या ‘चारित्र्य पडताळणी’ ला आता ब्रेक लागला आहे. कोणत्याही नोकरीस हे पाचही मुलं आजच अपात्र ठरले आहेत. आई, वडीलांनी त्यांच्यासाठी खूप मोठे स्वप्न पाहिले असतील, आता या स्वप्नांचाही चुराडा झालेला आहे. आपली मुलं काय करतात, ते कोणासोबत राहतात, महाविद्यालयात नियमित जातात का? हे पाहणे देखील पालकांचे कर्तव्य आहे. त्यांचे दुर्लक्ष झाल्याने अशा घटनांचा मोठा स्फोट होतो. एकुणच वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिले तर त्याचे परिणाम वाईटच होतात हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव