शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सैनिकांचे गाव फुल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:55 PM

स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

ठळक मुद्देसैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवरसैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी सांभाळला कार्यभार १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग

सुधीर पाटीलवरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात गावातील स्वातंत्र्य सैनिकांनीही सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढण्याचे प्रेरणास्थान सानेगुरुजींकडून मिळाले. तेव्हापासून देशसेवेचे व्रत उचलत आजही देशरक्षणार्थ तरुणांचा कल आहे.स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावातील राममंदिरात साने गुरुजीनी इंग्रजाच्या लक्षात न येता देश स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना सहभागी करून घेत ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारली. त्यात त्रंबक झेंडू पाटील, अमृत पाटील (दिवानजी) त्र्यंबक पंडू पाटील, नारायण आवसू चौधरी, भालचंद्र नारायण पाटील, नथ्थू तोताराम चौधरी अशी एक स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात कारवाया करताना त्यांना अमळनेर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली.त्यानंतर कालांतराने १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा असल्याने येथील तरुण गावाच्या लोकसंखेच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी कार्यभार सांभाळला आहे.कॅप्टन रामदास चौधरी यांनी सन १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर वासुदेव सोमा महाजन यांनी सन १९७१ च्या युध्दासह श्रीलंकेत शांती सेनेत सहभाग नोंदवला. तसेच हरी नारायण कोलते यांनी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.माजी सैनिकांचे मार्गदर्शनसैन्य दलातून निवृत्तीनंतर या माजी सैनिकांनी तरूणांना सतत मार्गदर्शन केल्याने तरूणांचा कल देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्याही वाढली.ऐतिहासीक वास्तूसन १८११ साली उभारण्यात आलेली राममंदिराची वास्तू १० वर्षांनंतर आजही स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार म्हणून डौलाने उभी आहे

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनBhusawalभुसावळ