शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बाजारपेठेत प्रत्येक दहापैकी सहा लोक विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:10 IST

कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी : हातगाडीवाले, दुकानदारांनाही मास्कचे वावडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका ...

कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी : हातगाडीवाले, दुकानदारांनाही मास्कचे वावडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेले ठिकाण म्हणजे शहरातील बाजारपेठा असून, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि विक्रेते अशा प्रत्येक दहापैकी सहाजण हे विनामास्क वावरत असल्याचे गंभीर चित्र गुरूवारी येथील बाजारपेठेत पाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे यावेळी त्यांना दंड ठोठवायला किंवा सूचना द्यायला एकही प्रशासकीय कर्मचारी त्याठिकाणी नव्हता. त्यामुळे शहरातील विविध भागातून एकवटणारी व नियम न पाळणारी गर्दीच कोरोनाला निमंत्रण देत आहे.

शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रूपये दंड ठोठावण्यासह काही कडक आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी दिले आहेत. मात्र, गुरूवारी बाजारपेठेत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, अत्यंत गंभीर चित्र बघायला मिळाले.

कोठे काय होते

- टॉवर चौक ते गांधी मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या फूल, चहा, फळविक्रेते हे विनामास्क होते. एका दुकानावर चार-चार लोक अगदी जवळजवळ विनामास्क बसलेले होते.

- सुभाष चौकाच्या अगदी मधोमध ५० मीटरच्या आत सात लोटगाड्या होत्या. यात द्राक्षे, चिकू विकले जात होते. सातपैकी केवळ दोन विक्रेत्यांनी रुमाल बांधला होता. तिघांनी तो मानेवर लटकवला होता तर दोघांनी नाका-तोंडाला काहीच बांधलेले नव्हते.

- एक पोलीस कर्मचारी याठिकाणी गाड्या हटवत होता. मात्र, मास्क लावण्याबाबत कुठल्याही सूचना देत नव्हता. या कर्मचाऱ्याने स्वत:ही मास्क अर्धवट लावलेला होता.

- गाडीवर गर्दी होत होती. बाजारात फिरणाऱ्या दहापैकी केवळ चारच लोकांनी मास्क लावले होते.

- सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडाला होता.

- सुभाष चौकातील दुकानदारांपैकी दोन ते तीन दुकानदारांनीच मास्क लावले होते.

- अनेकांनी रुमाल व मास्क लावला होता मात्र तो तोंडाच्या खाली सरकवलेला होता.

एटीएममध्ये फज्जा

गोंविदा रिक्षा स्टॉपवरील एका एटीएमवर दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा लवलेशही नव्हता.

बाजारपेठेत अधिक धोका का?

१ शहरातील सर्व ठिकाणचे नागरिक याठिकाणी एकवटतात.

२ कोण बाधित आहे, याची कोणालाही कल्पना नसते.

३ याठिकाणी गर्दी टाळणे अशक्य असते.

४ विक्रेते आणि ग्राहक हे एकमेकांच्या अगदी जवळून संपर्कात येतात. शिवाय मास्कचा अनेकांना विसर पडलेला असतो.

बाजारात जाताय काय कराल?

१ अत्यावश्यक असेल तरच बाजारात जा.

२ बाजारात जाताना मास्क व्यवस्थित नाक व तोंड झाकेल, असा लावा.

३ गर्दी टाळा, जिथे गर्दी दिसेल तिथे न जाता गर्दी नसलेल्या दुकानात जा, पर्याय नसेल तर थोडे बाजूला थांबून नंतर खरेदी करा. सर्वांशी बोलताना सुरक्षित अंतर ठेवा.

४ बाजार झाल्यानंतर हात धुतल्याशिवाय नाका, तोंडाला, डोळ्याला लावू नका.

५ घरी आल्यावर हात, चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

मास्क कसे सुरक्षित?

बाधित व्यक्ती आपल्या जवळ येऊन संवाद साधत असल्यास, शिंकल्यास, खोकल्यास ते पार्टीकल आपल्या नाका-तोंडात जावून कोरोनाचा संसर्ग होतो. अशावेळी आपण किमान ट्रीपल लेअर मास्क परिधान केले असल्यास हे पार्टीकल मास्कच्या बाहेर अडकून राहतात ते नाका-तोंडात जात नाहीत व आपण सुरक्षित राहतो.

कोट

बाजारपेठेत अर्धवट मास्क घालणाऱ्या व्यक्तिही असतात, हे असे मास्क घालणे धोक्याचे आहे. मास्क व्यवस्थित नाक व तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीने लावावा, बाजारात गर्दी करू नये, एकमेकांशी दुरूनच संवाद साधावा. - डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा