शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणारी बहिणाबाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:02 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चाळता स्मृतीची पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील लिहिताहेत जीवनाचे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी...

लौकिक अर्थाने बहिणाबाई अशिक्षित होती. ना तिने पाटी-पुस्तक हाती घेतले ना ती कोणत्या पाठशाळेत गेली. पण जीवनाचे तत्त्वज्ञान तिने इतक्या सहज पद्धतीने व सोप्या शब्दात सांगितले आहे की, थक्क व्हायला होते. तिचा काळ लक्षात घेतला तर अजून स्तिमित व्हायला होते. जीवनाच्या पाठशाळेत सर्वचजण जातात पण सर्वांनाच जीवनातील प्रसंग, घटना, माणसं, माणसांचे वागणे, निसर्ग वाचता येतात असे नाही. बहिणाबाईने ह्या सर्व गोष्टी आपल्या पारखी नजरेने पारखून घेतल्या आहेत. आपल्या चिकित्सक व तल्लख बुद्धीने आणि सूक्ष्म निरीक्षण शक्तीने जाणून घेतल्या आहेत. तिचे ज्ञान अनुभवातून आलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगी तिने केलेले भाष्य अचूक व सटीक आहे.मानवी जीवनाचे सार परोपकारात आहे. म्हणून ती, ‘हिरीताच देन घेन’ कवितेत स्पष्टपणे सांगते की, हिरीताच देन घेन पोटासाठी नाही. ‘नको लागू जीवा सदा मतलबापाठी’ म्हणत असताना ती जगण्याचे मर्मच स्पष्ट करते. केवळ स्वत:साठी जगणे म्हणजे जगणे नाही. दुसºयाच्या मदतीसाठी हात आखडता घेतला तर तो हात काय कामाचा, संकटाच्या प्रसंगी दुसºयाच्या मदतीला नाही धावले तर ते पाय काय कामाचे! म्हणून ती आपल्या जीवाला सांगते की जो पीडला गेला आहे त्याचं दु:ख समजून घे, जो गांजलेला आहे त्याची मदत कर. जीवन कसं जगावं याबद्दल ती म्हणते,‘‘जग जग माझ्या जीवा, अस जगणं तोलाचउच्च गगना सारखं, धरित्रीच्या रे मोलाच।’’बहिणाबाईची जीवनावरची, जगण्यावरची श्रद्धा वादातीत आहे. पण ते जीवन कसे असावे याबद्दलचे तिचे विचारही सुस्पष्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी माणसाचे मी पण आडवे येते. अहंकाराने तो इतका फुगतो की त्याला वाटते त्याच्या इतका मोठा कोणीही नाही. बहिणाबाई अगदी सोप्या शब्दात त्या अहंकाराच्या फुग्यातील हवा काढून घेते. तीव्र भुकेच्या वेळी अन्नाचा एक घास, तहान लागलेली असताना पाण्याचा एक घोट माणसापेक्षा मोठा असतो. माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतघ्नपणाचा ती धिक्कार करते व अशा माणसांपेक्षा गोठ्यातले जनावर बरे असे ती म्हणते व माणसाला पोट तिडकीने प्रश्न करते,‘मन’ ह्या कवितेत चंचल मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न बहिणाबाईने केला आहे. माणसाच्या मनावर तिने केलेले भाष्य म्हणजे तिची माय सरस्वती तिला बोली शिकविते याची साक्ष आहे. मन कसे चंचल आहे, लहरी आहे, जहरी आहे, चपळ आहे, पाखरा सारखे आहे, खसखसच्या दाण्यासारखे लहान व आकाशासारखे विशाल आहे याचे वर्णन करून शेवटी देवालाच प्रश्न करते की, ‘‘देव अस कस मन घडल, कुठे जागेपणी तुले असे सपन पडल.’’मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेले स्वप्न आहे ह्या ओळी वाचल्यानंतर वाटते की, बहिणाबाईच विधात्याला जागेपणी पडलेले सुंदर स्वप्न आहे.(क्रमश:)

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव