शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

शिवाजीनगर उड्डाणपूल व महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे, मनपा व महावितरणने हातवर केल्याने शासनाकडे ११ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:22 AM

विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतरासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासह महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब व जलवाहिनी स्थलांतराच्या कामासाठी निधी नसल्याचे कारण सांगत मनपा व महावितरणने हात झटकल्याने हे काम रखडले आहे. दोघांकडून नकार घंटा मिळाल्याने अखेर जिल्हा प्रशासनाच्यावतीने यासाठी शासनाकडे ११ कोटींचे प्रस्ताव पाठविले असून त्याची प्रतीक्षा आता या कामासाठी आहे. जो पर्यंत या प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही व हा निधी मिळत नाही तोपर्यंत हे काम रेंगाळत राहणार असल्याचे चित्र सध्या यामुळे निर्माण झाले आहे.शहरातील दोन महत्त्वाचे व जिव्हाळ््याचे विषय असलेले महामार्ग चौपदरीकरण व शिवाजीनगर उड्डाणपूल ही कामे गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्या न कोणत्या कारणांमुळे रखडत आहे. यामुळे एकतर अपघातात अनेकांना जीव गमवावे लागत आहे व दुसरीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाअभावी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या कामासाठी अनेक अडथळ््यांनंतर या कामास मंजुरी मिळाली व डिपीआरही मंजूर झाला. हे सर्व होत असताना त्या-त्या विभागांवर त्यांच्याशी संबंधित कामांची जबाबदारी सोपविण्यात आली. यात मनपाने व महावितरणने त्यांच्याकडील विद्युत खांब स्थलांतरीत करावे, अतिक्रमण हटवावे व इतर कामे सोपविण्यात आली. असे झाले तरी मनपाने व महावितरणने या कामांसाठी आपल्याकडे निधी नसल्याचे सांगत हात वर केले.त्या दरम्यान महामार्गाच्या कामासाठी ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम देण्यात आले. कंपनीला काम तर दिले आहे मात्र महावितरण व मनपाकडून अद्यापही विद्युत खांब न हटविल्याने ते अडथळे ठरू पाहत आहे.अशाच प्रकारे शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठीदेखील मनपाने जलवाहिनी व महावितरणने विद्युत खांब स्थलांतरीत करणे अपेक्षित होते. मात्र तेथेही तसे न झाल्याने हा प्रकार अडथळा ठरत आहे.अखेर जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्तावशिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे हे शहरवासीयांसाठी महत्त्वाचे असल्याने त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांनी यासाठी सहा कोटी रुपये देण्याचे मान्य करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हे काम ेहोणार आहे.विशेष बाब म्हणून निधीची मागणीमहामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळे ठरणारे विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरने जिल्हा विकास नियोजन समितीकडे (डीपीडीसी) जवळपास ५ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र जिल्हा स्तरावरून एवढा निधी तत्काळ देता येणार नसल्याने तसा प्रस्ताव डीपीडीसीमार्फत शासनाकडे पाठविण्यात येऊन ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून या निधीला मंजुरी मिळण्याची मागणी केली आहे.हे दोन्हीही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून ते मंजूर झाल्यानंतरच हे कामे होतील, एवढे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मनपा व महावितरणच्या अडमुठे धोरणामुळे हे काम रेंगाळत असल्याचे एकूणच चित्र आहे.महामार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी महावितरणने निधीची मागणी केली आहे. मात्र जिल्हास्तरावर निधी देता येणार नसल्याने तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून ऊर्जा सचिवांकडे विशेष बाब म्हणून मंजुरीची मागणी केली आहे.प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी.

टॅग्स :Jalgaonजळगाव