शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

युतीमुळे जिल्ह्यात शिवसेनेची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 4:56 PM

चंद्रशेखर जोशी जळगाव : युती नसावी, किमान एक जागा मिळावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आग्रही होते. यासाठी विविध ...

चंद्रशेखर जोशीजळगाव : युती नसावी, किमान एक जागा मिळावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आग्रही होते. यासाठी विविध व्यासपीठांवर पक्षाचे जिल्ह्यातील नेते भाजपावर टीका करत होते मात्र आता युती झाल्यामुळे या पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाल्याचे म्हणावे लागेल.जिल्ह्यात भाजपाचे प्राबल्य असले तरी शिवसेनेचे आक्रमकता गेल्या काळात दिसून आली. सत्तेत भागीदार असले तरी शिवसेनेने सतत टीका भाजपावर केली. एवढेच नव्हे तर पक्षाचे उपनेते राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट पंतप्रधानांवरही टीका केली. याबाबत भाजपाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त झाली. जळगाव लोकसभा मतदार संघात सहा पैकी दोन विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार आहेत. पालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेत शिवसेना या मतदार संघात वरचढ आहे. मात्र प्रत्येक वेळी भाजपाने बाजी मारल्याचेच दिसून येते. अगदी उत्तमराव पाटील यांच्या काळापासून या पक्षाचे प्राबल्य या मतदार संघात आहे. पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. ती परंपरा केवळ एकदा खंडीत झाली. त्यानंतर पुन्हा भाजपाने बाजी मारल्याचा इतिहास आहे. यावेळी या मतदारसंघात शिवसेनेकडून यावेळी जय्यत तयारी झाली आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जय्यत तयारी सुरू केली होती.रावेरमध्ये आता काय भूमिकारावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्राबल्य आहे. मंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे यांचे मतदार संघ या मतदार संघात येतात. या मतदार संघात दोन्ही नेत्यांनी शिवसेनेला वाढू दिले नसल्याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असते. तर जलसंपदा मंत्री यांनी ‘संपविण्याची भाषा’ शिवसेना पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागली होती. पक्षाच्या पदाधिकाºयांनी याबाबत महाजन यांचे नाव घेऊन नाराजीही व्यक्त केली. युती झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांची अडचण झाली आहे.नंदुरबारला गटातटात युती निष्फळनंदुरबार लोकसभा मतदारसंघात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक असल्याने त्यात युतीचा निर्णयाचा फारसा प्रभाव पडणार नाही. तथापि, दोन्ही पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण होते. हा संभ्रम सोमवारी दूर होऊन युतीचा निर्णय झाला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील चित्र पाहता या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध डॉ.विजयकुमार गावीत गट असे सरळ राजकारण आहे. त्यात भाजपाचे अस्तित्व तिसºया क्रमांकावर आहे. तथापि, डॉ.गावीत यांनी गेल्या निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचाच परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला होता.एकीकडे सोयीच्या राजकारण करणाºया कार्यकर्त्यांची संख्या अधिक असली तरी निष्ठावंत कार्यकर्तेही मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये मात्र युती झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.धुळे मतदारसंघात युतीचा भाजपला फायदाचधुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपा- सेना युतीची घोषणा झाल्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाला याचा निश्चितच फायदा मिळणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळेसही भाजपा - सेनाने एकत्रच निवडणूक लढविली होती. यंदा युती झाली नसती तर मतदारसंघात सर्वच ठिकाणी मताची विभागणी झाली असती. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला असता आणि विरोधकांना त्याचा फायदा मिळाला असता. परंतु युती झाल्यामुळे मताची विभागणी थांबले आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपाला लोकसभेत मिळणार आहे. कारण मालेगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार आहेत. तेथून भाजपाला चांगली मदत मिळेल. पण धुळयात महापालिका निवडणुकीत भाजप - सेना नेत्यांचे संबंध दुरावले आहे. त्यांची मने जुळणे थोडे कठीण असल्याची स्थिती आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव