शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

"बाळासाहेबांनी दिलेला 'तो' ताईत आजही माझ्या देव्हाऱ्यात", गुलाबराव पाटलांकडून आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 12:54 IST

Gulabrao Patil : बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आज उजाळा दिला.

- प्रशांत भदाणे

जळगाव :  1999 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर माझ्या कपाळाला गुलाल लावून गळ्यात ताईत घातला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी दिलेला तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना आज उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने मंत्री पाटील यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभला म्हणून मी आज याठिकाणी पोहचलो आहे. माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांसाठी ते दैवत आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हा दिवस शिवसैनिकांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. विविध उपक्रमांनी आम्ही हा दिवस साजरा करतो.

बाळासाहेब आज आपल्यात नाहीत, हे कधीही आम्हाला वाटत नाही. कारण त्यांचे विचार कायम आहेत. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिवसेना ही सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेली संघटना आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी देखील नेतृत्त्व देतांना सर्वसामान्य लोकांना प्राधान्य दिले. कदाचित बाळासाहेब नसते तर माझ्यासारख्या व्यक्तीला मंत्रिपदापर्यंत पोहोचता आले नसते, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

'ही' आठवण मी मरेपर्यंत विसरणार नाही!बाळासाहेबांचा मला प्रत्यक्ष सहवास लाभला हे माझं भाग्यच आहे. 1999 मध्ये मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेच्या सभापती होतो. त्यावेळी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली होती. आमच्या मतदारसंघातून माझ्यासह गुलाबराव वाघ, रमेश महाजन यांची नावे चर्चेत होती. शेवटी माझे नाव निश्चित झाल्याने तिकीट मागण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. त्यावेळी जनता दल आणि इतर पक्षांसोबत शिवसेनेची युती होती. त्यामुळे एक प्रस्ताव असा आला की जनता दलाचे महेंद्रसिंग पाटील यांना मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. पण त्यावेळी महेंद्रसिंग पाटील यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या कपाळाला गुलाल लावून माझ्या गळ्यात उमेदवारीचा ताईत टाकला. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडूनही आलो. ही आठवण मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. बाळासाहेबांनी माझ्या गळ्यात टाकलेला ताईत मी आजही जपला आहे. तो ताईत आजही माझ्या घराच्या देव्हाऱ्यात आहे, अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली.

'विरोधकांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही'बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आज राहिली नाही, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते, या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्हाला विरोधकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या पाठीशी आणि देशात हिंदुत्वासाठी शिवसेना सातत्यानं उभी राहते. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसैनिक सतत लढा देत आले आहेत. आम्ही तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही. सरकार स्थापनेपासून विरोधकांचं फाटलं आहे. त्यांच्याकडे आज कोणताही मुद्दा नसल्याने ते शिवसेनेवर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करत असतात. त्यांनी सरकार स्थापनेवेळी जर पहल केली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती, असा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे