शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पाळधी येथील सर्पमित्रांनी अजगराला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 4:57 PM

१० फूट लांबीच्या अजगरास पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरजसर्पास न मारता, सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवा

पाळधी, ता.जामनेर : येथे १० फूट लांबीच्या अजगरास पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे.रब्बी हंगाम सुरू झाला असून, गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत परिसरात असलेल्या गारव्यामुळे अनेक विषारी सर्प पाण्याच्या ठिकाणी वास करत असून, यामुळे शेतकºयांना रात्री अंधारात सर्पदंश होण्याचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितित शेतकºयांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.सोमवारी पहूर परिसरातील शेतकरी फकिरा नथ्थू घोंगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये मोटार ठेवण्याच्या जागेवर बसलेल्या अजगराचे दर्शन शेतकरी फकिरा घोंगडे यांना घडले. या अजगराचे अगडबंब रूप पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पाळधी येथील नाना माळी या सर्पमित्राला बोलविले. त्यानंतर सर्पमित्र नाना माळी यांनी १० फूट लांबीच्या अजगरला पकडले. नाना माळी यांचे धाडस पाहून शेतकºयांनी त्यांंचे आभार मानत कौतुक केले.सर्पमित्राने अजगरास जामनेर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांच्या ताब्यात दिले. अजगराला सुरक्षित अधिवासात सोडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पी.एल.राणे व डॉ.एस.एस.व्यवहारे यांनी प्रथमोपचार केले. परिसरामध्ये साप आढळल्यास त्याच्यावर हल्ला न चढविता, त्याला न मारता सर्पमित्राच्या माध्यमातून जंगलामध्ये सोडण्याची व्यवस्था केल्यास अन्नसाखळी अबाधित राहते, असे वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी सांगितले.काही जातीचे साप विषारी, काही निमविषारी, तर काही बिनविषारी जातीचे असतात. सर्पमित्र साप पकडतात म्हणून कोणीही साप पकडण्याचे धाडस करू नये. कारण अपूर्ण माहितीच्या आधारे चुकीच्या पद्धतीने सापडल्यामुळे दंश झाल्यास जीवावरसुद्धा बेतू शकते. त्यामुळे युवकांनी विश्वासू सर्पमित्रांशीच किंवा माझ्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सांगितले.पाळधीसह परिसरात कोठेही मानवी वसाहतीत साप निघाल्यास मला माहिती देतात. आजपर्यंत कुणाकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जवळपास ७०० सापास पकडून वनअधिवासात सोडून दिले आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होत आहे. -नाना माळी, सर्पमित्र, पाळधी

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर