शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

सारीचाही गंभीर धोका, दररोज तीन ते चार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना संशयित रुग्णांचा अधिक समावेश असून यात सारीचे अधिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असताना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना सारी असल्याचे निदान केले जाते. सारीने रोज तीन ते चार मृत्यू होत असल्याची गंभीर माहिती आहे.

जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत एका आठवड्यात १५० पेक्षा अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यात बाधितांची संख्या अगदीच कमी हेाती. मात्र, संशयितांचे मृत्यू अधिक असल्याचे गंभीर चित्र होते. नेमकी ही संख्या वाढली कशी अशी माहिती घेतली असता, सारीच्या रुग्णांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे सारी

सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस हा एक प्रकारचा विकार असून, यात अत्यंत कमी दिवसांत श्वासोश्वासाची समस्या उद्भवते, अचानक ऑक्सिजनची पातळी खालावते व रुग्ण अचानक दगावू शकतो. या लक्षणांमध्ये सर्वांत आधी कोरोनाची टेस्ट केली जाते. ती बाधित आली म्हणजे कोरोनाचे निदान केले जाते, मात्र, ही टेस्ट निगेटिव्ह असली म्हणजे अशा रुग्णाला सारीचा रुग्ण म्हणून संबोधले जाते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. शंभरांतून तीन ते चार टक्के यात मृत्युदर असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यू वाढले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज होणाऱ्या मृत्यूचे परीक्षण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती रोज होणाऱ्या मृत्यूची नोंद घेत असते. यात २४ मार्चपासून ही समिती कार्यरत असून, तेव्हापासून रजिस्टरमध्ये केलेले नोंदीनुसार शंभरांपेक्षा अधिक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. मात्र, यात अनेक संशयित रुग्णांचा समावेश आहे. अनेकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. संशयित रुग्णांना सारीचा रुग्ण म्हणूनच संबोधले जाते, असेही काही डॉक्टरांनी सांगितले.

रोजचे २०-२५ रुग्ण

सारीचे रोज किमान २० ते २५ रुग्ण समोर येत आहेत. मात्र, पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक संशयितांचे मृत्यूनंतर स्वॅब घेतले जातात, ते निगेटिव्ह येत असल्याचे प्रमाण कमी असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ७५८ सारी प्रतिबंधित क्षेत्र

शासकीय माहितीनुसार जिल्ह्यात सारी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून, असे जिल्ह्यात ७५८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत, यात ग्रामीण भागात ५८४, शहरी भागात १६१, तर मनपा हद्दीत असे १३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यानुसार सारीच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे.