शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

सारीचाही गंभीर धोका, दररोज तीन ते चार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्याच सारीचे नवे संकट उभे राहिले आहे. मृतांमध्ये कोरोना संशयित रुग्णांचा अधिक समावेश असून यात सारीचे अधिक रुग्ण असल्याचे समोर येत आहे. कोरोनासदृश्य लक्षणे असताना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना सारी असल्याचे निदान केले जाते. सारीने रोज तीन ते चार मृत्यू होत असल्याची गंभीर माहिती आहे.

जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत एका आठवड्यात १५० पेक्षा अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यात बाधितांची संख्या अगदीच कमी हेाती. मात्र, संशयितांचे मृत्यू अधिक असल्याचे गंभीर चित्र होते. नेमकी ही संख्या वाढली कशी अशी माहिती घेतली असता, सारीच्या रुग्णांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे सारी

सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस हा एक प्रकारचा विकार असून, यात अत्यंत कमी दिवसांत श्वासोश्वासाची समस्या उद्भवते, अचानक ऑक्सिजनची पातळी खालावते व रुग्ण अचानक दगावू शकतो. या लक्षणांमध्ये सर्वांत आधी कोरोनाची टेस्ट केली जाते. ती बाधित आली म्हणजे कोरोनाचे निदान केले जाते, मात्र, ही टेस्ट निगेटिव्ह असली म्हणजे अशा रुग्णाला सारीचा रुग्ण म्हणून संबोधले जाते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले. शंभरांतून तीन ते चार टक्के यात मृत्युदर असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यू वाढले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोज होणाऱ्या मृत्यूचे परीक्षण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती रोज होणाऱ्या मृत्यूची नोंद घेत असते. यात २४ मार्चपासून ही समिती कार्यरत असून, तेव्हापासून रजिस्टरमध्ये केलेले नोंदीनुसार शंभरांपेक्षा अधिक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहेत. मात्र, यात अनेक संशयित रुग्णांचा समावेश आहे. अनेकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. संशयित रुग्णांना सारीचा रुग्ण म्हणूनच संबोधले जाते, असेही काही डॉक्टरांनी सांगितले.

रोजचे २०-२५ रुग्ण

सारीचे रोज किमान २० ते २५ रुग्ण समोर येत आहेत. मात्र, पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अनेक संशयितांचे मृत्यूनंतर स्वॅब घेतले जातात, ते निगेटिव्ह येत असल्याचे प्रमाण कमी असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ७५८ सारी प्रतिबंधित क्षेत्र

शासकीय माहितीनुसार जिल्ह्यात सारी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून, असे जिल्ह्यात ७५८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत, यात ग्रामीण भागात ५८४, शहरी भागात १६१, तर मनपा हद्दीत असे १३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यानुसार सारीच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे.