शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अडचणींचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सद्य:स्थितीत चालू आहे. पाणीपुरवठा योजनेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सद्य:स्थितीत चालू आहे. पाणीपुरवठा योजनेचे जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून, भुयारी गटार योजनेचेदेखील ६० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ५५ टक्के भाग घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील उर्वरित भाग घेण्यात येणार असून, यासाठीच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेने अद्याप एकही प्रस्ताव तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.

शहरासाठी २०१५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना मंजूर झाल्या होत्या. त्यात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील संपूर्ण भाग घेण्यात आला. त्याचा प्रस्ताव तयार करताना शहरातील वाढीव भाग राहिल्याने आता नव्याने १६५ कॉलन्यांसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे; तर भुयारी गटार योजना शहरात दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ५५ टक्के भागातील काम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र हे काम पूर्ण करताना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प तयार करण्यात येतो. यासाठी महापालिका प्रशासनाला सुमारे १० एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र शहर परिसरात अशी जागा नसल्याने भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जागा असली तरी भूसंपादन करण्यासाठी निधीची आवश्यकता भासणार

पहिल्या टप्प्यातील कामासाठी शिवाजीनगर भागातील महापालिकेच्या जागेवर मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सद्य:स्थितीत सुरू आहे. या प्रकल्पाचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले असून, शहरातील ५० टक्के सांडपाण्यावर या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेकडे आवश्यक जागा उपलब्ध नाही. महापालिकेला या प्रकल्पासाठी इतर जागा संपादित करावी लागणार आहे. मात्र ही जागा संपादित करण्यासाठी महापालिकेकडे आवश्यक निधीची तरतूद अद्यापपर्यंत नाही. यामुळे शहरातील भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम अजून प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून प्रस्तावही तयार नाही

अमृत योजनेच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांचे काम थांबली आहे. भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. सप्टेंबरपर्यंत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहरातील ४५ टक्के भागात भुयारी गटार योजनेचे काम अद्याप बाकी आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठी जागाच नसल्याने महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी अद्यापदेखील प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने शहरातील उर्वरित भागांमध्ये रस्त्यांचे काम पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले तर पुन्हा नवीन तयार करण्यात आलेले रस्ते फोडण्याची वेळ महापालिकेवर येईल; त्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ जागेचा शोध घेऊन दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठीदेखील प्रस्ताव तयार करून घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

कोट..

शहरातील भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी महापालिकेकडे अद्याप मलनिस्सारण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. या जागेचा शोध घेऊन दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

- अरविंद भोसले, शहर अभियंता, महापालिका