शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 13:14 IST

महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत.

ठळक मुद्देनदीकाठावर असणाऱ्या खळ्यातील छोटी-मोठी जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जळगाव - खान्देशातील धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवस झालेल्या पावसामुळे महापूर आला आहे. पुराचे पाणी शहरात, गावखेड्यात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. चाळीसगाव तालुक्याीतल खेर्डे गावातही शेती आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं आहे. चाळीसगावचे आमदार आणि भाजप नेते मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. त्यासंदर्भात ट्विटरवरुन फोटोही शेअर केले आहे. यावेळी, बंद शाळांची झालेली दुर्दशाही त्यांनी सांगितली. 

चाळीसगाव शहरातील बहुतांश भागाला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. स्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरु केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली. तर, महापुरामुळे शाळांचेही मोठे नुकसान झाले आहे. 

महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. जि.प. शाळेची देखील अवस्था भयावह झालेली पाहायला मिळाली. शाळेतील महत्वाचा रेकॉर्ड खराब झाल्याने एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीकाठावर असणाऱ्या खळ्यातील छोटी-मोठी जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळात पुरापासून बचावासाठी काय करता येईल, याची गावातील पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.   

धुळे शहरालाही पावसाचा फटका

धुळे शहरातील बिलाल मस्जिदजवळील शंभर फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी रोड, चित्तरंजन कॉलनी, गजानन कॉलनी, जनता सोसायटी, हजार खोली, जामचा मळा, मौलवी गंज, समता नगर, भाईजी नगर, काजी प्लॉट, देवपूरमधील विटा भट्टी, आधार नगर, अंदरवाली मस्जिद, नेहरू नगर, लक्ष्मीवाडी मिल परिसर व देवपूर तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सुमारे दोन हजार कुटुंबांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत आमदार फारूक शाह यांनी आयुक्त अजीज शेख यांना माहिती दिली व तातडीने पाहणीचे आदेश दिलेत.  

टॅग्स :JalgaonजळगावfloodपूरRainपाऊसChalisgaonचाळीसगाव